16 वर्षांनंतर 8 दिवस आधीच आला; केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत प्रभाव:मान्सूनचे केरळमध्ये आगमन; येत्या 3 दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार

रोहिणी नक्षत्र लागण्याच्या एक दिवस आधी मान्सून देशात दाखल झाला. मान्सून नियोजित तारखेच्या आठ दिवस आधीच म्हणजे शनिवारी केरळमध्ये पोहोचला, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून २३ मे रोजी दाखल झाला होता. सध्या मान्सूनने केरळसह कर्नाटक, तामिळनाडू, गोव्याची किनारपट्टी व्यापली आहे. हवामान खात्याच्या मते, येत्या २-३ दिवसांत मान्सून देशाच्या ४०% भागाला व्यापू शकतो. तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मिझोराम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मते, मान्सून लवकर किंवा उशिरा येईल असा निष्कर्ष काढता येत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा पावसावर अवलंबून आहे. वर्षातील एकूणपैकी ७०% पाऊस मान्सूनच्या ४ महिन्यांत पडतो. हवामान खात्याने यंदा १०५% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शोधा … शोधा… कुठे गेला आपला उन्हाळा? कुणी तरी उचलून नेलाय … कुणी तरी दडवून ठेवलाय … कुणी तरी पळवलाय … माझा उन्हाळा, तुमचा उन्हाळा, आपल्या सर्वांचा उन्हाळा. होय खरंच… आपला उन्हाळा दिसेनासा झालाय. त्याची जागा संततधार, वादळी पावसाने घेतलीय. आता तर काळेशार ढग घेऊन मान्सून आठवडाभरात दाखल होतोय. म्हणजे पाऊस सुरूच राहणार आहे. दरवर्षी मे महिन्यात तर उन्हाळ्याचे अक्षरश: तांडव असायचे. उन्हाचा पारा कातडी अक्षरश: जाळायचा. पण यंदा मे महिन्यात फक्त ५ दिवसच उन्हाचे होते. त्यानंतर सगळे दिवस पावसाच्या आक्रमणाचेच. या वेळी राज्यात २२ मे पर्यंत सरासरीच्या ७६८ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. सेल्सिअसच्या पार जाणारे तापमान २६-२७ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे. खरंतर … शाळेत आपल्या सगळ्यांनाच शिकवलं गेलंय की, भारतात तीन ऋतु असतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. यंदा त्यातला उन्हाळाच गायब झालाय. कुठे गेलाय तो? उन्हाळा म्हणजे सूर्यदेवाचं आग ओकणं. उन्हाळा म्हणजे धरतीमातेवर आदळणाऱ्या उष्णतेच्या भयंकर लाटा. ज्या धरणीला तप्त करतात. उन्हाळा म्हणजे शेतातील ढेकूळ न ढेकूळ मोकळं करत शेतकऱ्याची नांगरट सोपी करणारा उग्र मित्र. उन्हाळा म्हणजे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या प्रचंड झळा. उन्हाळा म्हणजे आंब्याची चव चाखण्याची मौज. उन्हाळा म्हणजे पाण्याची वाफ होऊन ढग होण्याचा मोसम. पावसाची बेगमी करणारा हा मोसमच जणूकाही वाफ होऊन गेलाय. कावळ्याचे घर बांधण्यासाठीही ऊन दिसलं नाही यंदा. काय होत चाललंय हे ! येरे येरे म्हणायच्या आधी आलेला हा पाऊस आमचा उन्हाळा असा कसा वाहून नेऊ शकतो. हे बदललं पाहिजे, त्यासाठी आमचे जगणेही बदलले पाहिजे, असे नाही वाटत? मान्सून लवकर किंवा उशिराचा पावसावर परिणाम होत नाही. फक्त १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो. गेल्या ५० वर्षांत, मान्सून नियोजित तारखेला म्हणजे १ जून रोजी फक्त तीनदा दाखल झाला. २५ वेळा तो एक ते १२ दिवस आधी आला आहे. २२ वेळा तो उशिरा आला आहे. २००९ मध्ये, जेव्हा मान्सून २३ मे रोजी आला तेव्हा फक्त ७८% पाऊस पडला. २००३ मध्ये मान्सून १३ जून रोजी आला होता, पण त्या वर्षी १०२% पाऊस पडला होता. कसे कळते की मान्सून देशात दाखल झाला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment