महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…