आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मी वरळीतून निवडणूक लढवणार असून, आदित्य ठाकरे यांना पराभवाची धूळ चारण्याचा माझा निर्धार आहे, असे त्यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकल्या गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी माझी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्या कानावर मी माझ्या भावना टाकल्या आहेत. मी वरळीतून लढलो तर मला 25 हजारांहून अधिक लीड मिळेल. यामुळे आदित्य ठाकरे यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. मी आतापर्यंत केव्हाच शरद पवारांना घाबरलो नाही. उद्धव ठाकरेंना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना मी सहजपणे उडवून लावले. त्यामुळे महायुती माझ्या नावाचा विचार नक्कीच करेल असा विश्वास आहे. मी वरळी येथील जिजामाता नगरमधील 8 हजार झोपडपट्टीवासियांचा विकास करेन. त्यांना 600 चौरस फुटांचे घर देईल. एक मोठा विकास मी तिथे करून दाखवेन. ‘शिवनेरी सुंदरी’ नको ‘माता रमाई’ योजना काढा गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी महायुती सरकारच्या शिवनेरी सुंदरी योजनेवरही निशाणा साधला. त्यांनी यासंबंधी एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भरत गोगावले यांना मी एवढेच सांगेन की, त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे त्यांना एसटी महामंडळामध्ये क्रांती करायची असेल, तर त्यांनी 7 वा वेतन आयोग लागू करावा. त्यातून आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. आमच्या वाहकांवर ज्या छोट्या – मोठ्या कारवाया होतात, तो जीआर त्यांनी हाणून पाडावा. आमच्या महिला या सक्षम आहेत. त्या भिमाईच्या स्वरूप आहेत. रमाईच्या स्वरूप आहेत. माता जिजाऊच्या स्वरूप आहेत. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता गोगावले यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे. हे ही वाचा… मनोज जरांगे यांचे फडणवीसांना आव्हान:मराठ्यांना डावलून निवडणूक घेतली तर पश्चात्ताप होईल, तुमचे सगळे गणित बिघडवून टाकू छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असे म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मी वरळीतून निवडणूक लढवणार असून, आदित्य ठाकरे यांना पराभवाची धूळ चारण्याचा माझा निर्धार आहे, असे त्यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकल्या गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी माझी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्या कानावर मी माझ्या भावना टाकल्या आहेत. मी वरळीतून लढलो तर मला 25 हजारांहून अधिक लीड मिळेल. यामुळे आदित्य ठाकरे यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. मी आतापर्यंत केव्हाच शरद पवारांना घाबरलो नाही. उद्धव ठाकरेंना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना मी सहजपणे उडवून लावले. त्यामुळे महायुती माझ्या नावाचा विचार नक्कीच करेल असा विश्वास आहे. मी वरळी येथील जिजामाता नगरमधील 8 हजार झोपडपट्टीवासियांचा विकास करेन. त्यांना 600 चौरस फुटांचे घर देईल. एक मोठा विकास मी तिथे करून दाखवेन. ‘शिवनेरी सुंदरी’ नको ‘माता रमाई’ योजना काढा गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी महायुती सरकारच्या शिवनेरी सुंदरी योजनेवरही निशाणा साधला. त्यांनी यासंबंधी एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भरत गोगावले यांना मी एवढेच सांगेन की, त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे त्यांना एसटी महामंडळामध्ये क्रांती करायची असेल, तर त्यांनी 7 वा वेतन आयोग लागू करावा. त्यातून आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. आमच्या वाहकांवर ज्या छोट्या – मोठ्या कारवाया होतात, तो जीआर त्यांनी हाणून पाडावा. आमच्या महिला या सक्षम आहेत. त्या भिमाईच्या स्वरूप आहेत. रमाईच्या स्वरूप आहेत. माता जिजाऊच्या स्वरूप आहेत. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता गोगावले यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे. हे ही वाचा… मनोज जरांगे यांचे फडणवीसांना आव्हान:मराठ्यांना डावलून निवडणूक घेतली तर पश्चात्ताप होईल, तुमचे सगळे गणित बिघडवून टाकू छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असे म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर