Monthly Archive: June, 2025

वाल्मीक कराडची मकोकामधून दोषमुक्त करण्याची न्यायालयात मागणी:17 तारखेला होणार महत्त्वाची सुनावणी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती

वाल्मीक कराडची मकोकामधून दोषमुक्त करण्याची न्यायालयात मागणी:17 तारखेला होणार महत्त्वाची सुनावणी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज न्यायालयात आज सुनावणी पार पडली. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत सुनावणीदरम्यान काय घटना घडल्या तसेच कोणता युक्तिवाद करण्यात आला याची माहिती दिली आहे. वाल्मीक कराडने त्याच्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात उत्तरे दिली आहेत, त्या अर्जाची चौकशी येत्या 17 तारखेला होणार असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे. वाल्मीकची मकोकामधून...

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार?:सुधाकर बडगुजर नाराज, म्हणाले- पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतले नाही

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार?:सुधाकर बडगुजर नाराज, म्हणाले- पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतले नाही

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. तसेच सोमवारी 2 जून रोजी बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना देखील बडगुजार यांनी...

दिल्लीत आज इंडिया ब्लॉकची बैठक:200 हून अधिक खासदारांची PMना पत्र लिहून ऑपरेशन सिंदूरवर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांनी तीव्र केली आहे. मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये इंडिया ब्लॉक नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीनंतर दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक लोकसभा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हे पत्र प्रसिद्ध केले...

कनिमोझी स्पेनमध्ये म्हणाल्या- एकता व विविधता ही भारताची राष्ट्रभाषा:आमचे प्रतिनिधीमंडळ जगाला हा संदेश देण्यासाठी आले आहे

भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुक खासदार कनिमोझी यांनी सोमवारी स्पेनमध्ये सांगितले की, भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. त्या म्हणाल्या की, हे शिष्टमंडळ जगाला हाच संदेश देण्यासाठी आले आहे. खरं तर, स्पेनमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना, त्यांना भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे असे विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना कनिमोझी म्हणाल्या, ‘भारताची राष्ट्रीय भाषा एकता आणि विविधता आहे. आज जगाला...

सरकारी नोकरी:सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख जवळ, ४ जूनपर्यंत अर्ज करावे

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कौन्सिलर एफएलसी आणि बीसी सुपरवायझर या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: संबंधित क्षेत्रातील पदवीधर, बी.टेक/बीई, एम.एससी, एमबीए/पीजीडीएम, एमसीए पदवी वयोमर्यादा: बीसी पर्यवेक्षक: निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे पगार: अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक बीसी...

गुरुग्राममधील हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबली होती शर्मिष्ठा:ऑनलाइन बुकिंग केले, फोनवरून सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल माहिती घेतली

इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा तिच्या कुटुंबासह हरियाणाच्या गुरुग्राममधील साउथ सिटी-१ मध्ये असलेल्या अर्बन ओएसिस हॉटेलमध्ये थांबली होती. शर्मिष्ठा तिच्या आईवडिलांसह आणि भावासोबत १० दिवस हॉटेलमध्ये राहिली. दरम्यान, ३० मे रोजी कोलकाता पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले आणि शर्मिष्ठा आणि तिच्या वडिलांना सोबत घेऊन गेले, त्यानंतर सकाळी तिची आई आणि भाऊही बाहेर पडले. २ खोल्या बुक केल्या होत्या हॉटेल संचालक मनोज यादव यांनी सांगितले...

आसाम-मेघालय 5 वादग्रस्त भागात सीमास्तंभ बसवणार:15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल काम; 2022 मध्ये याबाबत झाला होता करार

आसाम आणि मेघालय यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला सीमावाद सोडवण्याच्या दिशेने दोन्ही राज्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी सोमवारी घोषणा केली की १५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत पाच वादग्रस्त भागात सीमास्तंभ बसवले जातील. ही माहिती दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. मार्च २०२२ मध्ये आसाम आणि मेघालय यांनी ज्या १२ वादग्रस्त क्षेत्रांचे निराकरण करण्यासाठी करार केला होता त्यापैकी सहा वादग्रस्त क्षेत्रांपैकी...

पंकजा मुंडे-धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र:पंकजा म्हणाल्या – राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने निमंत्रण दिले

पंकजा मुंडे-धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र:पंकजा म्हणाल्या – राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने निमंत्रण दिले

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे-धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहे. यावर पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्याने त्या पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे....

दिव्य मराठी अपडेट्स:मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या भेटीला

दिव्य मराठी अपडेट्स:मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या भेटीला

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा…   

सरकारी नोकरी:छत्रपती संभाजीनगर घाटीत ३५७ पदांसाठी भरती; पगार ६० हजारांपेक्षा जास्त, लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड

सरकारी नोकरी:छत्रपती संभाजीनगर घाटीत ३५७ पदांसाठी भरती; पगार ६० हजारांपेक्षा जास्त, लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरने ३०० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. शैक्षणिक पात्रता: जारी केलेले नाही वयोमर्यादा: सरकारी नियमांनुसार शुल्क: पगार: निवड प्रक्रिया: अर्ज कसा करावा: कृपया सर्व आवश्यक कागदपत्रांसह भरलेला फॉर्म खालील पत्त्यावर पाठवा: डॉ. शिवाजी सुक्रे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती आणि डीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर...