बरसणारा मान्सून नव्हे तर वळवाचा पाऊस?:हवामान तज्ज्ञांचा दावा; मुंबईसह महाराष्ट्राचा बहुतांश भाग अजूनही मान्सून वाऱ्यापासून वंचित?

बरसणारा मान्सून नव्हे तर वळवाचा पाऊस?:हवामान तज्ज्ञांचा दावा; मुंबईसह महाराष्ट्राचा बहुतांश भाग अजूनही मान्सून वाऱ्यापासून वंचित?

मुंबई – पुणे सह राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला असला तरी हा मान्सूनचा पाऊस नसून वळवाचा पाऊस असल्याचा दावा हवामान तज्ज्ञांनी केला आहे. मोसमी वारे मुंबई पर्यंत दाखल झाले आहेत. मात्र अद्यापही राज्यातील काही भागात मान्सूनचा पाऊस पडला नसल्याचा हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सूनपूर्व तीव्र वादळी ढगांमुळे राज्यातील काही भागात पाऊस झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सून मध्ये वाऱ्याची दिशा ही दक्षिण – पश्चिम असते. मात्र मुंबई आणि पुण्यातील सध्या वाऱ्याची दिशाही उत्तर- पश्चिम आहे. असा दावा देखील तज्ज्ञांनी केला आहे. 28 मे नंतर महाराष्ट्रासह अनेक भागात मोठे बदल दिसून येतील. त्यानंतर 30 मे पासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असणार आहे. मान्सूनचा मोठा पाऊस 5 जून पर्यंत महाराष्ट्रात पडणार नाही. असा दावा देखील हवामान तज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी केला आहे. कोरडी हवा ही मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक लावणार आणि तो मान्सूनचा नॉर्मल टाईम टेबल असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधीच आगमन केले असून, राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत २६-२७ मे दरम्यान कोलाबा येथे १६२ मिमी आणि सांताक्रूझ येथे १४४ मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे गेल्या दशकातील मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सूनची सद्यस्थिती
मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र: या भागांत मान्सूनने वेळेआधीच प्रवेश केला असून, पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा: या भागांतही मान्सूनच्या आगमनाने पावसाची शक्यता वाढली आहे, विशेषतः नागपूरसारख्या शहरांमध्ये पूरस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे . हवामान विभागाचे अलर्ट रेड अलर्ट: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी. ऑरेंज अलर्ट: रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी. शेतीवरील परिणाम
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे भात, ऊस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी जमिनीची तयारी करण्यास अडचणी येत आहेत . हवामानाचा अंदाज नागरिकांसाठी सूचना

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment