प्रतीक्षा संपली ‘समृद्धी’ पूर्णत्वास:देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज झाले आहे. यामुळे एका अर्थाने मागील वेळी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यामुळे नागपूर ते मुंबई मधील अंतर कमी झाले असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेतील एक मुकुटमणी, ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चा अंतिम टप्पा (इगतपुरी ते आमणे -76 किमी) सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील इगतपुरी–आमणे (76 किमी) अंतिम टप्प्याचे भव्य लोकार्पण होत आहे. या लोकर्पणानंतर संपूर्ण 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन नागपूर–मुंबई प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…