‘मरहट्ट्यांनी शासक म्हणून राज्य करण्याचा पाया याच दिवशी घातला’:राज ठाकरेंकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

‘मरहट्ट्यांनी शासक म्हणून राज्य करण्याचा पाया याच दिवशी घातला’:राज ठाकरेंकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठमोळ्या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा झाला त्याच दिवशी हिंदू भूमीला प्रेरणा मिळाली, मात्र त्याचबरोबर मराठ्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केले, त्याचा पाया देखील या दिवशी घातला गेला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य म्हणजे, एक युगपरिवर्तन आणि युगपरिवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मराठमोळ्या शब्दात सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. या संदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज शिवराज्याभिषेक सोहळा… छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे, एक युगपरिवर्तन आणि युगपरिवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे, शिवराज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याने या हिंदभूमीला तर प्रेरणा मिळालीच पण मरहट्ट्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केले त्याचा पाया पण याच दिवशी घातला गेला. हा दिवस मराठी माणसाला प्रेरणा देत राहू दे हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा!’ रायगडावर दैदिप्यमान सोहळा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर आज दैदिप्यमान सोहळा पार पडत आहे. 351 वर्षांपूर्वी याच दिवशी, 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ गडावर लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली असून, राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत जयघोषांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला आहे. जगदीश्वर मंदिरातून महाराजांच्या पालखीने राजसदरेकडे प्रस्थान केले असून, पालखी मार्गावर शिवभक्तांनी मानवी साखळी करून सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली आहे. होळीचामाळ, बाजारपेठ व राजसदर परिसरात शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. युवराज शहाजी राजे भोसले यांनी राजेशाही पोशाखात रोपवे मार्गे पायऱ्यांद्वारे राजसदरेवर आगमन केले आहे. गडावरून ‘राजांना मुजरा’ करण्यासाठी देशभरातून आलेल्या 3 ते 4 लाख शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment