राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेनेवर काय परिणाम होईल?:शंभूराज देसाई म्हणाले ‘कुंडलीचा अभ्यास करावा लागेल’

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेनेवर काय परिणाम होईल? याबद्दल काय बोलणार? कारण आपण अद्याप त्या दोघांच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केलेला नाही. कुंडली बघणाऱ्या एखाद्या जोशींकडे जाऊन आता दोघांची कुंडली बघणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. शंभूराज देसाई यांनी दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याचा शिवसेनेवर परिणाम होणार का? यावर बोलले टाळले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती बाबत दोन्ही पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्या – त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे दोन पक्षांमध्ये अधिकृत प्रवक्ते पक्षाच्या वतीने किंवा पक्षाच्या प्रमुखांच्या वतीने जोपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडत नाहीत. तोपर्यंत इतरांनी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. जर असे झाले तर काय होईल? जर तसे झाले तर काय होईल? हे बोलणे योग्य नाही. दोन्ही पक्षाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर त्यावर बोलणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यांची युती या आधी का झाली नव्हती? दोन्ही पक्षातील नेत्यांचा एकमेकांवर विश्वास आहे का? आहे तर का आहे? नाही तर का नाही? त्यांची पूर्वीचे अनुभव काय आहेत? त्यांची युती या आधी का झाली नव्हती? नेमके त्यावेळी काय घडले होते? या सर्व गोष्टींचा त्या – त्या पक्षातील नेते आणि प्रमुख मंडळी विचार करतील. त्याबद्दल आम्ही जास्त बोलणे योग्य नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पक्षातील नेत्यांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होत नाही. तोपर्यंत जर-तरच्या गोष्टीवर भाष्य करणे आमच्यासारख्या मंत्र्यांना योग्य वाटत नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत लोकांनी पक्ष कोणाचा हे ठरवले हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कोणाची, हे आम्हाला शिकवलेले आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा विचार मांडणारी शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे ते म्हणत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाचा स्ट्राइक रेट हा जनतेने दाखवून दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकांनी पक्ष कोणाचा हे ठरवले आहे. लोकशाहीत लोकमतला महत्व असते. जनतेने मत देऊन मत पेटीतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पुढे घेऊन चाललो आहोत. याचे दूध का दूध, पाणी का पाणी महाराष्ट्रातील जनतेने केले असल्याचे देखील देसाई यांनी म्हटले आहे.