दुर्घटनांतून धडा:गर्दी, प्रति चौरस मीटरमध्ये दोन जण हवे, ड्रोनने निगराणी करावी, यंदा चेंगराचेंगरीच्या मोठ्या घटनांत 72 मृत्युमुखी

प्रयागराज महाकुंभापासून ते बंगळुरूमधील आरसीबी उत्सवापर्यंत यंदा चेंगराचेंगरीच्या ५ मोठ्या घटनांमध्ये ७२ लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीतील प्रदूषण पातळीतील बदलाला तोंड देण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन आपोआप लागू होत. अगदी तसाच गर्दी व्यवस्थापनासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन लागू केल्यास मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची परिस्थिती टाळता येईल. गर्दी व्यवस्थापनासाठी मानक कार्यप्रणाली (एसआेपी) आता गरज बनली आहे. मेळा, उत्सव, यात्रा, कथा, क्रीडा कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, राजकीय सभा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, रेल्वे स्टेशन, मॉल किंवा एखाद्या सेलिब्रिटीचा रोड शो अशा प्रत्येक कार्यक्रमात गर्दीची परिस्थिती वेगळी असते. पण एक गोष्ट सारखीच आहे की किती गर्दी जमू शकते याचा अंदाज लावता येत नाही. आयोजकाने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक येऊ नयेत याची खात्री करावी. कार्यक्रमस्थळी प्रति चौरस मीटर एक किंवा दोनपेक्षा जास्त लोक असतील तर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग वेगळे असले पाहिजेत. प्रवेश आणि बाहेर पडण्याची सूचना स्पष्टपणे चिन्हांकित केली जावी. गर्दी वळविण्यासाठी आणि थांबवण्यासाठी मजबूत बॅरिकेड्स असावेत. गर्दी व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सीसीटीव्ही, ड्रोन आणि सेल्युलर डेटाद्वारे वाढत्या गर्दीवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. गर्दी वाढत असताना अलर्ट सिस्टम असावी. उदाहरणार्थ- जर प्रति चौरस मीटर ४-५ लोक असतील तर पिवळा इशारा. जर ५-६ लोक असतील तर ऑरेंज अलर्ट. ६ पेक्षा जास्त असल्यास रेड अलर्ट द्यावा. म्हणजे गर्दी रोखता येईल. कशी असावी एसआेपी… आयोजनापूर्वी मॉक ड्रिल करावे, तंत्रज्ञानातून गर्दीचा अंदाज घ्यावा भौतिकशास्त्र नियमातून गर्दीचे नियंत्रण शक्य भौतिकशास्त्राच्या आधारे चेंगराचेंगरी रोखता येते. दाट गर्दीची हालचाल द्रवाच्या लाटांसारखी असते. द्रव गतिमानतेचे नियम सांगू चेंगराचेंगरी कुठे शक्य आहे, हे सांगू शकतात. एका चौरस मीटरमध्ये ३ लोक असल्यास ते एकमेकांना स्पर्श न करता सहज हालचाल करू शकतात. परंतु त्या जागेत ५ पेक्षा जास्त असल्यास दाट गर्दी होते. यात लोक हालचाल करू शकणार नाहीत आणि एकमेकांशी टक्कर देतील. डॉ. रवींद्रकुमार सिंघलपोलिस आयुक्त, नागपूर; गर्दी नियंत्रण विशेषज्ञ आयआयटी मद्रासने गर्दीचे वर्तन रिअल टाइममध्ये समजून घेण्यासाठी एक मॉडेल तयार केले आहे. गर्दी नियंत्रणासाठी या अल्गोरिदमचा वापर होऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून आयआयटी मद्रास महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आषाढ एकादशीला गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी वैज्ञानिक मदत करत आहे. वारी यात्रेदरम्यान १२ ते १५ लाख लोक विठोबा मंदिरात दर्शन घेतात. प्रो. पल्लब सिन्हा महापात्रा,प्रो. महेश पंचनगुला यांच्या नेतृत्वाखालील आयआयटी टीमने विविध मोजमाप, गणनेवर आधारित काही शिफारसी दिल्या. या आधारे, पोलिसांनी वैज्ञानिक गर्दी व्यवस्थापन प्रणाली लागू केली. प्रो. पंचनगुला म्हणाले, गर्दी व्यवस्थापन सुरळीत झाले. ते म्हणाले, संस्था मंदिरे किंवा ट्रस्टला मदत करण्यास तयार आहे.