खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झालेय:आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, वाल्मीक कराडची दोषमुक्ती नको; फिर्यादी अर्जात सांगितले कारण

खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झालेय:आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, वाल्मीक कराडची दोषमुक्ती नको; फिर्यादी अर्जात सांगितले कारण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड व सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाल्मीक कराडला मकोकातून दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी कराडच्या वकिलांकडून करण्यात आली होती. आता या प्रकरणी फिर्यादींनी देखील आपले म्हणणे न्यायालयात अर्जाद्वारे मांडले आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे धनंजय देशमुख यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, सीआयडी, एसआयटीकडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात खंडणी ते खून हे दोन्ही प्रकरणे एकत्रित आहेत. त्यामुळे खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झाले आहे. या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे अर्जात म्हटले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंतलेल्या या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे, यातून कोणीच सुटणार नाही. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील काठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. 17 तारखेला पुढील सुनावणी होणार दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. मकोका कायद्यांतर्गत असणाऱ्या काही कलमात आरोपीच्या संपत्तीची जप्ती करता येते. त्यानुसार आता 17 तारखेला कराडच्या संपत्तीच्या जप्तीवर काय निकाल समोर येतो तसेच मकोका मधून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम काय म्हणाले होते? मागच्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी माहिती देताना उज्ज्वल निकम म्हणाले होते की, वाल्मीक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेले आहेत. त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल. त्या अर्जावर युक्तिवाद माझे सहकारी ॲड. कोल्हे हे करतील. तसेच या खटल्यात मला मकोका मधून दोषमुक्त करावे. त्यावर आम्ही कोर्टाला असे प्रस्तावित केले की याला दोषमुक्त करावे की याच्यावर आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात यावर न्यायालयाने आणि बचाव पक्षाच्या वकिलांची हरकत असल्याने बचाव पक्षाकडून असे सांगण्यात आले की प्रथम त्याला मकोकामधून मुक्त करावे. या अर्जावर चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असे म्हटले. त्यामुळे आता वाल्मीक कराडला मकोकाच्या तरतुदी लागू होतात की नाही यावर 17 तारखेनंतर युक्तिवाद होतील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment