राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार?:ठाकरे बंधूंच्या युतीविषयी जयंत पाटलांचे मोठे विधान, म्हणाले- आघाडीची ताकद वाढत असेल तर..

राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार?:ठाकरे बंधूंच्या युतीविषयी जयंत पाटलांचे मोठे विधान, म्हणाले- आघाडीची ताकद वाढत असेल तर..

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात कमालीचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटले जात आहे, तर दुसरीकडे पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जे जनतेच्या मनात, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. आघाडीची ताकद वाढत असेल राज ठाकरेंना सामील करण्यात गैर नाही माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, ठाकरे यांना एकत्रित आणण्याचे काम माध्यमे करत आहेत. राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत. जर आघाडीची ताकद वाढत असेल, तर त्यांना सामील करण्यात काहीच गैर नाही, असे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. जयंत पाटलांच्या या विधानामुळे आता प्रश्न उपस्थित झाला आहे की, राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटासोबत युती करणार की महाविकास आघाडीसोबत जाणार? कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हावी अशी इच्छा अनेक शिवसैनिक तसेच मनसैनिक व्यक्त करत आहेत. परंतु ही युती केवळ दोघांची असणार का? दोघांचीच असल्यास शिवसेनेला महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे लागेल, अन्यथा राज ठाकरे यांनाच महाविकास आघाडीत जावे लागणार. दोन्ही ठाकरे बंधू काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे. प्रसारमाध्यमांमधून ही चर्चा पसरवली जात आहे जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशा कोणत्याही चर्चा पक्षात सुरू नाहीत. केवळ प्रसारमाध्यमांमधून ही चर्चा पसरवली जात आहे, असे पाटलांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन आहे, याविषयी विचारले असता जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उद्या पुण्यात वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. गेल्यावर्षी नगरमध्ये जेव्हा कार्यक्रम झाला, त्यावेळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यंदा हवामान खात्याचा अंदाज पावसाचा नसला तरी कोणताही रिस्क नको म्हणून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या सभागृहात कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment