आ. तांबेचे बोलणे बालीश, ऋण लक्षात ठेवावे:मामा बाळासाहेब थोरात यांचे भाचा आमदार सत्यजिततांबे यांना कानपिचक्या

आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्याराजकीय वक्तव्यांची सध्या जाेरदार चर्चाहाेत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेराहुल गांधी महाराष्ट्रातील नेत्यांना भेटतनाहीत, असे त्यांनी म्हटले होते. यावक्तव्यावर आता त्यांचे मामा आणिकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीकानपिचक्या घेत, तांबेचे वक्तव्य,बालिशपणाचे असल्याचे मत पत्रकारपरिषदेत मांडले. नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी, डॉ.सुधीर तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म देऊनही,त्यांनी माघार घेतली होती. तर आ.सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूकलढवून विजय मिळवला. त्या निवडणुकीतसंगमनेर केंद्रस्थानी राहिले. आता युवाधोरण समितीत अपक्ष आ. तांबेची नियुक्तीकरण्यात आली आहे. समितीत उर्वरीतपाच आमदार हे सत्ताधारी पक्षातील आहेत.या नियुक्तीमुळेही तांबेची सत्ताधाऱ्यांशीजवळीक वाढल्याची चर्चा आहे. एकावक्तव्यात थेट राहूल गांधी यांना भेटूनदाखवा, असे आव्हान केले होते. यावरथोरात यांनी आ.तांबे यांना सुनावले. उत्तरेत राजकीय संघर्ष राहणारच उत्तरेत पक्ष कोणताही असो, पण विखे व थोरातयांच्यातील वितुष्ट कायम राहिले आहे. आताथोरातांचे भाचे आ. तांबे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, २५ मे रोजी,माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी, भूमिका स्पष्टकेली. संगमनेर तालुक्यातील जनतेचा प्रश्नयेईल, त्यावेळी ठराविक राजकारण स्थानिकपातळीवर होत राहील असे स्पष्ट केले. मामा,काका, भाचे कोणी आले तरी संगमनेरच्याहिताचे काम करणार असल्याचे वक्तव्य केले.त्यामुळे उत्तरेतील संघर्षाची धग कायम राहणारआहे.