3 शाळकरी मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न:कासव असल्याचे सांगत विहिरीत ढकलले, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भयंकर घटना

3 शाळकरी मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न:कासव असल्याचे सांगत विहिरीत ढकलले, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भयंकर घटना

अल्पवयीन तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंपळे येथील या घटनेने संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने या तिन्ही शाळकरी मुलांचा जीव वाचला आहे. दोरखंडामुळे वाचला मुलांचा जीव यासंबंधितच्या वृत्तानुसार, बुधवार (दि. १८ ) सायंकाळच्या सुमारास वराद घुगे, अथर्व घुगे आणि आदित्य सानप घराच्या अंगणात खेळत असताना संशयित अमोल लांडगे, विक्रम माळी, साईनाथ ठमके यांनी बाजूच्या विहिरीत कासव आहे, तुम्हाला दाखवतो असे मुलांना म्हटले. त्यानंतर मुले कासव पाहण्यासाठी विहिरीत डोकावली असता त्यांना विहिरीत ढकलून दिले व तिथून पळ काढला. विहिरीत पडल्यानंतर त्यांच्यातील एका मुलाने विद्युत पंपाला बांधलेली दोरी पकडत इतर दोघांनाही सावरल्याने तिघांचाही जीव वाचला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. पालकांची पोलिसांत तक्रार जीव वाचवून घरी आल्यानंतर मुलांनी घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. दुसऱ्या दिवशी पालकांनी पोलीस ठाणे गाठत अमोल लांडगे, विक्रम माळी, साईनाथ ठमके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पालकांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे याच्याविरोधात कट रचून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर इतर दोघे फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. जीवे मारण्याच्या उद्देशाने या मुलांना विहिरीत ढकलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, संजय गोसावी, अमोल शिंदे करत आहेत.फरात झालेल्या संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

​अल्पवयीन तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंपळे येथील या घटनेने संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने या तिन्ही शाळकरी मुलांचा जीव वाचला आहे. दोरखंडामुळे वाचला मुलांचा जीव यासंबंधितच्या वृत्तानुसार, बुधवार (दि. १८ ) सायंकाळच्या सुमारास वराद घुगे, अथर्व घुगे आणि आदित्य सानप घराच्या अंगणात खेळत असताना संशयित अमोल लांडगे, विक्रम माळी, साईनाथ ठमके यांनी बाजूच्या विहिरीत कासव आहे, तुम्हाला दाखवतो असे मुलांना म्हटले. त्यानंतर मुले कासव पाहण्यासाठी विहिरीत डोकावली असता त्यांना विहिरीत ढकलून दिले व तिथून पळ काढला. विहिरीत पडल्यानंतर त्यांच्यातील एका मुलाने विद्युत पंपाला बांधलेली दोरी पकडत इतर दोघांनाही सावरल्याने तिघांचाही जीव वाचला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. पालकांची पोलिसांत तक्रार जीव वाचवून घरी आल्यानंतर मुलांनी घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. दुसऱ्या दिवशी पालकांनी पोलीस ठाणे गाठत अमोल लांडगे, विक्रम माळी, साईनाथ ठमके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पालकांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे याच्याविरोधात कट रचून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर इतर दोघे फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. जीवे मारण्याच्या उद्देशाने या मुलांना विहिरीत ढकलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, संजय गोसावी, अमोल शिंदे करत आहेत.फरात झालेल्या संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment