भास्कर एक्स्पर्ट:जागतिक बाजारावर 20 वर्षांत चिनी कब्जा… हे चित्र बदलावे लागेल

चीनसोबतची आपली व्यापारी तूट १०० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याचा अर्थ असा की आपण चीनला जे विकत आहोत त्यापेक्षा १०० अब्ज डॉलर्सच्या वस्तू जास्त खरेदी करत आहोत. जर आपल्याला हे चित्र बदलायचे असेल तर आपल्याला मेक इन इंडियाद्वारे सखोल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उत्पादनासाठीच्या कच्च्या मालाची किंमत कमी करावी लागेल. त्याचा पाया तयार करण्यासाठी ३-४ वर्षे लागू शकतात. चीननेही २० वर्षांत ३००-४०० अशाच प्रकारच्या औद्योगिक समस्या सोडवून या क्षेत्रात प्रभुत्व मिळवले. या काळात चीनने देशातच दैनंदिन वापराच्या अनेक लहान वस्तू बनवण्यास सुरुवात करून प्रगतीत मोठी झेप घेतली. आपल्याकडे क्षमतांची कमतरता नाही. फार्मा क्षेत्राचे उदाहरण घ्या, जेथे आपण रेणूचे उलट अभियांत्रिकी करून जेनेरिक औषधे बनवली. ही आपली ताकद आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात त्याची पुनरावृत्ती करू शकतो. निर्यात वाढवणे गरजेचे… २०२३-२४ मध्ये देशाची एकूण निर्यात ४३७.०७ अब्ज डॉलर्स (३६.१८ लाख कोटी रु.) होती. त्याच वेळी, आयात ६७८.२१ अब्ज डॉलर्स (५६.१६ लाख कोटी रु.) होती. चीनशी स्पर्धा करताना या अडचणी, तिथे उत्पादन खर्च ५०% कमी चीनच्या तुलनेत भारतात उत्पादन खर्च २० ते ५० टक्क्यांनी जास्त आहे, त्यामुळे चीनमधून आयात होणारी उत्पादने स्वस्त पडतात. भारतात यंत्रसामग्री, कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च अधिक आहे, त्यामुळे लघु उद्योगांतील उत्पादन महाग होते. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे केले जातात. त्यामुळे खर्च तुलनेने कमी येतो. चिनी वस्तूंवर अंकुश लावू शकत नाही, लोकांनीच मागणी घटवावी देशातील निर्यात प्रकरणांचे तज्ज्ञ आरके मारू म्हणतात की सरकार चिनी निर्यातीवर अंकुश लावू शकत नाही. फक्त व्यापारी व ग्राहकच मागणी कमी करू शकतात. ग्राहक खरेदीच करत नसतील तर व्यापारीही वस्तू घेणार नाहीत. तथापि, चीनसारख्या देशांमधून स्वस्त आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार एक टीम तयार करत आहे. हजारो कोटी रु.मध्ये बटणे, पेन, कंगव्यासारख्या गोष्टी मागवतो २०२४ च्या आर्थिक वर्षात भारताने चीनमधून सुमारे ७,५२१ वस्तू आयात केल्या. यामध्ये ५४,२७८ कोटी रुपयांच्या प्लास्टिक आणि रबरी वस्तूंचा समावेश होता. कापड ४२,३०५ कोटी, कागदी वस्तू ७,४११ कोटी, लाकडी वस्तू २२०५ कोटी आणि दगड आणि काच १८७६९ कोटी रु.च्या होत्या. आयात वस्तूंमध्ये बटणे, पेन, लायटर, कंगवा अशा वस्तूही आहेत… हेअरपिन, टूथपिक, नट-बोल्टपर्यंत विदेशी झाले आहेत; लोकांनी ठरवावे विदेशी वस्तू खरेदी करणार नाही अन् व्यापारीही विकणार नाहीत : मोदी २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी व अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रत्येक भारतीयाने ठरवावे की ते कोणतेही परदेशी उत्पादन वापरणार नाहीत. प्रत्येक गावातील व्यापाऱ्यांनी शपथ घ्यावी की ते कितीही नफा मिळाला तरी परदेशी वस्तू विकणार नाहीत. लहान डोळ्यांच्या गणेशापासून ते होळीचा रंग व पिचकारीपर्यंत सर्वकाही परदेशातून येत आहे. प्रत्येक घरात जा व सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती परदेशी उत्पादने वापरली, याची यादी बनवा. हेअरपिन, टूथपिक्स, नट व बोल्टमध्येही परदेशी उत्पादने घुसलीत. देशाच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते आपण फक्त भारतातच बनवणे, ही काळाची गरज आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २७ मे रोजी भुज दौऱ्यात हे आवाहन केले.