‘भाजप’सारखा निर्लज्ज पक्ष देशाच्या नाही तर जगाच्या राजकारणात झाला नाही:संजय राऊत कडाडले; मोदींच्या ‘सिंदूर यात्रे’वर टीका

‘भाजप’सारखा निर्लज्ज पक्ष देशाच्या नाही तर जगाच्या राजकारणात झाला नाही:संजय राऊत कडाडले; मोदींच्या ‘सिंदूर यात्रे’वर टीका

पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या डोक्यावरील कुंकू पुसले गेले. त्याचे राजकारण करु नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मात्र, तेच मोदी राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘भाजप’ सारखा निर्लज्ज पक्ष देशाच्या नाही तर जगाच्या राजकारणात आजपर्यंत झाला नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नरेंद्र मोदी सरकारने पहलगाम हल्ल्याचे सरळ सरळ राजकारण सुरू केले आहे. इतकेच नाही तर निती आयोगाच्या बैठकीमध्ये देखील ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री चर्चा करत आहेत. हे राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. बिहार सारख्या राज्यांमध्ये भाजपच्या वतीने पंतप्रधानांचे लष्करी वेशातील फोटो लावले जात आहेत. याला जबाबदार कोण? पहलगाम हल्ल्याचे राजकारण कोणी करू नये असे तुम्ही आम्हाला सांगत आहात. आम्ही ते मान्य करू. मात्र, तुम्ही पंतप्रधानांचे लष्करी पेहरावातील फोटो होल्डिंग, जाहिराती मध्ये लावत आहात. अशा पद्धतीचे राजकारण करत आहात. यात तुम्ही शहीद झालेल्या जवानांचा आणि ज्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्या महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ऑपरेशन सिंदूर तुम्ही केले ते राष्ट्रासाठी केले, भाजपसाठी केलाय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment