भारतातील 85% हून जास्त जिल्हे पूर, दुष्काळाच्या संकटात- अहवाल:पूरग्रस्त राहणाऱ्या देशातील 45% जिल्ह्यांत दुष्काळाचा धोका
भारतातील 85% पेक्षा जास्त जिल्हे पूर, दुष्काळ व चक्रीवादळ यांसारख्या कठोर हवामान बदलांच्या घटनांनी (एक्स्ट्रीम वेदर) प्रभावित झाले आहेत. आयपीई ग्लोबल आणि ईएसआरआय इंडियाने केलेल्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की देशातील 45% जिल्ह्यांमध्ये ‘क्लायमेट स्वॅपिंग’ची परिस्थिती दिसून येत आहे. म्हणजेच जे जिल्हे परंपरेने पूरप्रवण होते पण आता त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच दुष्काळी भागात पूरपरिस्थिती...