भाच्याने आत्याला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले:कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांनी केली महिलेची सूटका
कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी साखळदंडातून सदरील महिलेची सुटका केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी परिसरामध्ये एका महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आहे. सारिका साळी असे या...