Category: marathi

‘अजित पवारांची तक्रार करु नका, त्यांच्याच मागे लागा’:तेच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे – अमित शहा यांच्या भाजप आमदारांना सूचना

‘अजित पवारांची तक्रार करु नका, त्यांच्याच मागे लागा’:तेच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे – अमित शहा यांच्या भाजप आमदारांना सूचना

अजित पवार यांची तक्रार घेऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे गेलेल्या भाजपच्या आमदारांना शहा यांनी वेगळाच सल्ला दिला आहे. अजित पवार यांची तक्रार करू नका, उलट त्यांच्यामागे तसेच इतर सर्वच मंत्र्यांच्या मागे कामासाठी तगादा लावा. त्यामुळे अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे, अशा शब्दात अमित शहा यांनी भाजप आमदारांना सूचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार...

अश्लील व्हिडिओ, काळी जादू आणि गांजा:वैष्णवी हगवणे प्रकरणातील संकेत चौंधे कुटुंबावर देखील गंभीर आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

अश्लील व्हिडिओ, काळी जादू आणि गांजा:वैष्णवी हगवणे प्रकरणातील संकेत चौंधे कुटुंबावर देखील गंभीर आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चौंधे यांच्यावर देखील त्यांच्या घरातील महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. माझा नवरा सुरेश चौंधे हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या बायकोने केला आहे. इतकेच नाही तर आपली सासू काळी जादू करते, असे म्हणत तिने नवरा आणि दीर हे सासू समोरच गांजा...

राज्यात पावसाचे 8 बळी, लातुरात घरांमध्ये शिरले पाणी:नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने नांदेडला मायलेकी, पुतणी ठार

राज्यात पावसाचे 8 बळी, लातुरात घरांमध्ये शिरले पाणी:नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने नांदेडला मायलेकी, पुतणी ठार

राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी मराठवाड्यातील २५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात मायलेकींसह पुतणी असे तीन तर अहिल्यानगरात पावसामुळे भिंत कोसळून २ महिला ठार झाल्या तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ३ बळी गेले आहेत. नांदेड जिल्ह्यात शेतातून घरी येताना नाल्याच्या पुरात मायलेकी आणि पुतणी अशा तिघी जणी वाहून गेल्याची घटना वरवट (ता. हदगाव) येथे मंगळवारी दुपारी...

भारत-पाक वादावर पोस्ट केलेल्या मुलीला मिळाला जामीन:मुंबई HCने म्हटले- गुन्हेगारासारखे वागवले, पोलिसांना तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते का!

भारत-पाक वादावर पोस्ट केलेल्या मुलीला मिळाला जामीन:मुंबई HCने म्हटले- गुन्हेगारासारखे वागवले, पोलिसांना तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते का!

भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित सोशल मीडिया पोस्टसाठी अटक केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तिला महाविद्यालयीन परीक्षेला बसता यावे म्हणून न्यायालयाने तिची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने म्हटले की, विद्यार्थिनीला एका कट्टर गुन्हेगारासारखे वागवले गेले. हे खूप धक्कादायक आहे. पोलिस मुलीचे आयुष्य...

रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवाला धोका:महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातच महिला आयोगात तक्रार, सोबत ऑडिओ क्लिपही दिली

रुपाली चाकणकरांकडून माझ्या जीवाला धोका:महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातच महिला आयोगात तक्रार, सोबत ऑडिओ क्लिपही दिली

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका होत असून त्यांच्या राजीनामा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच संगीता भालेराव या महिलेने थेट राज्य महिला आयोगातच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, चाकणकरांकडून आपल्याला जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफी वीर म्हणतात:नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफी वीर म्हणतात:नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफी वीर म्हणतात. मात्र, न्यायालयाने अशा लोकांना फटकारले हे बरे झाले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांना माफीवर म्हणणाऱ्यांना दम दिला असून पुन्हा असे बोलाल तर शिक्षा देऊ, अशी ताकीद दिली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यासाठीच मला सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायचे असल्याचे देखील...

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास नोंदणी फी माफ:मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास नोंदणी फी माफ:मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देखील आहे. शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या...

भैय्या पाटील विरुद्ध बीड पोलिसांत गुन्हा दाखल:जाती-जातीत द्वेष, विशिष्ट समाजाला गुन्हेगार म्हणून सोशल मीडियावर विखारी लिखाण

भैय्या पाटील विरुद्ध बीड पोलिसांत गुन्हा दाखल:जाती-जातीत द्वेष, विशिष्ट समाजाला गुन्हेगार म्हणून सोशल मीडियावर विखारी लिखाण

मस्साजोग सरपंच हत्ये पासून सोशल मीडियावर द्वेषमूलक लिखाण करून जाती जातीत द्वेष पसरवून तेढ निर्माण करणे, भडकाऊ मजकूर प्रसिद्ध करणे, एका संपूर्ण जातीला गुन्हेगार ठरवणारे लिखाण करणाऱ्या, तसेच पोलिस अधिकाऱ्यांची नावे, जाती लिहून त्यांच्यावर तथ्यहीन आरोप करणाऱ्या शेकडो पोस्ट फेसबुक व एक्स सोशल मीडियावर करून जाती जातीत विष पसरीविण्याचे काम करणाऱ्या भैय्या पाटील नामक व्यक्ती विरुद्ध बीड सायबर पोलीस ठाण्यात...

मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे संतापले:’भाजप शासित मुंबई’ म्हणत एकनाथ शिंदे यांचा ‘भ्रष्ट-नाथ शिंदे’ असा उल्लेख

मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे संतापले:’भाजप शासित मुंबई’ म्हणत एकनाथ शिंदे यांचा ‘भ्रष्ट-नाथ शिंदे’ असा उल्लेख

मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप शासित मुंबई असा उल्लेख करत राज्य सरकारवर टीका केली आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख देखील त्यांनी भ्रष्ट-नाथ शिंदे असा केला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाले नसेल तर घाईघाईत उद्घाटन करण्यावरून देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले....

अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाला नवे वळण:सुपारी घेऊन खुनाचा कुटुंबाचा आरोप; सीबीआय चौकशीची मागणी, पोलिसांच्या भूमिकेवरच संशय

अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाला नवे वळण:सुपारी घेऊन खुनाचा कुटुंबाचा आरोप; सीबीआय चौकशीची मागणी, पोलिसांच्या भूमिकेवरच संशय

वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एनकाऊंटर मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा एनकाऊंटर सुपारी घेऊन करण्यात आला असल्याचा आरोप आरोपीच्या बहिणीने केला आहे. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून पोलिसांच्या भूमिकेवर संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप...