Category: marathi

रूपाली चाकणकरांबद्दलच्या पोस्टवरून महिलेला धमकावले?:महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का? रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल

रूपाली चाकणकरांबद्दलच्या पोस्टवरून महिलेला धमकावले?:महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का? रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल

पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. काहींनी तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. त्यातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये चाकणकर यांच्या एका समर्थक महिलेने एका सामान्य महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप होत आहे. ही क्लिप...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने जाहीर केलेल्या नाहीत, त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे होत आहेत. सरकारच्या मनात असते, तर या निवडणुका अजून चार वर्षांनीही झाल्या नसत्या, अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने या निवडणुका एकत्र लढण्याचा प्रयत्न सुरू असून, स्थानिक पातळीवर सर्व पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. ही चर्चा नाही,...

विकृतीची सीमा ओलांडली!:नागपूरमध्ये घोडीवर बलात्कार; CCTVमुळे भेद उघड, आरोपी अटकेत

विकृतीची सीमा ओलांडली!:नागपूरमध्ये घोडीवर बलात्कार; CCTVमुळे भेद उघड, आरोपी अटकेत

राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र असतानाच आता विकृतीने सर्व सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. नागपूरच्या खाणी परिसरातील एका घोडेस्वारी अकादमीत १७ मे रोजी रात्री हा विकृत प्रकार घडला. ही घटना अकादमीतील सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली....

मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ यांना तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील:पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो, गिरीश महाजन यांचे विधान

मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ यांना तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील:पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो, गिरीश महाजन यांचे विधान

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्यानेच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच दिले जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ यांना तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील, असे विधान महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांना छगन...

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट:मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट:मुख्यमंत्र्यांचे नीती आयोगाच्या बैठकीत भाषण, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राजधानी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑपरेशन सिंदूर बद्दल हृदयपूर्वक आभार मानले. तसेच मोदीजींच्या दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प यातून अधोरेखित होतो, असे ते यावेळी म्हणाले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकार सुद्धा...

धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन:त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर माझी काही हरकत नाही, छगन भुजबळांचे मोठे विधान

धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन:त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर माझी काही हरकत नाही, छगन भुजबळांचे मोठे विधान

उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नव्यानेच छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेस जेव्हा फुटली तेव्हा मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की...

मयूरी जगतापची दखल घेतली असती तर वैष्णवी जीवंत असती:रूपाली ठोंबरे स्पष्टच बोलल्या, महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मयूरी जगतापची दखल घेतली असती तर वैष्णवी जीवंत असती:रूपाली ठोंबरे स्पष्टच बोलल्या, महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण मयूरी हगवणे या थोरल्या सुनेने आधीच हगवणे कुटुंबाची तक्रार आयोगाकडे केली होती. परंतु दाखल घेण्यात आली नव्हती. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट मत मांडले आहे. मयूरी हगवणे (जगताप) यांची दाखल घेतली गेली असती तर आज वैष्णवी जीवंत राहिली असती, असे रूपाली...

धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न:एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती- अनिल गोटे

धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न:एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती- अनिल गोटे

धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अनिल गोटे यांनी ज्या खोलीत पैसे होते त्या खोलीला कुलूप लावले होते. त्यानंतर पोलिसांनी ती खोली उघडून तपासली असता एक कोटी 84 लाख रुपये आढळून आले होते. ही खोली शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर...

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट:ठाण्यात गेल्या तीन दिवसांत 10 रुग्ण आढळले, मुंबईत सर्वाधिक 185 रुग्ण संख्या

राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट:ठाण्यात गेल्या तीन दिवसांत 10 रुग्ण आढळले, मुंबईत सर्वाधिक 185 रुग्ण संख्या

पुन्हा एकदा देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सरकारने अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत आता कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे. तर ठाण्यात गेल्या तीन दिवसात 10 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महापालिकेचे आरोग्य विभाग आता...

महिला आयोगाने आधीच लक्ष घातले असते तर..:नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली नाराजी, वैष्णवीच्या कुटुंबीयांची घेतली भेट

महिला आयोगाने आधीच लक्ष घातले असते तर..:नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली नाराजी, वैष्णवीच्या कुटुंबीयांची घेतली भेट

वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या मृत्यूने महाराष्ट्रात अद्यापही हुंडाबळी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. तसेच हगवणे यांच्या मोठ्या सुनेने यापूर्वीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती, परंतु आयोगाकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे....