Category: marathi

अकरावी प्रवेशाला सुरुवात:पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ

अकरावी प्रवेशाला सुरुवात:पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळपासून सुरू झाली, मात्र प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असून लवकरच ते सुरळीत सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यभरातून 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात एकूण 20,91,390...

शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड:लक्ष्मण मंघामला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड:लक्ष्मण मंघामला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई झाली आहे. सदर पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण मंघाम याला घर सोडण्याच्या तयारीत असतानाच अटक करून सायबर पोलिसांच्या हवाली केले आहे. मंघाम यानेच उपसंचालक उल्हास नरड यांचा पासवर्ड चाेरी करून घरी बसून बनावट शालार्थ आयडी तयार केले. मंघाम वाडी परिसरातील दाभा येथील वासंती अपार्टमेंटमधील ३०२ क्रमाकांच्या सदनिकेत राहात होता. सदर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रलेश कापसे व...

मराठवाडा आणि विदर्भातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

मराठवाडा आणि विदर्भातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

बोगस बियाण्यांचे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. खत कंपन्या सक्ती करत असतील, तर कारवाई करा, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच विभागीय बदल्या आणि पद भरती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना केल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदे सर्वात आधी भरा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील पदे शेवटी भरा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस...

राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार?:पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल

राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार?:पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल

जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरहून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या/आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात. पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदनाचा फोटो देखील...

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या कंपन्या महाराष्ट्रात सुरूच!:शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप, मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची केली मागणी

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या कंपन्या महाराष्ट्रात सुरूच!:शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप, मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची केली मागणी

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचे वातावरण अद्यापही आहेत. भारताने पाकिस्तानसोबत अनेक करार रद्द केले आहेत. सिंधू पाणी करार देखील रद्द केला आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा व्यवहार पाकिस्तानसोबत केला जाणार नसल्याचे धोरण भारताने अवलंबले आहे. अशात जे देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत त्या देशांवर देखील निर्बंध लादण्यात येत आहेत. परंतु या देशांमधल्या काही कंपन्या अजूनही महाराष्ट्रात कार्यरत असल्याचे समोर आले...

भान सुटलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे:देवेंद्रजी कुठे आहेत आणि तुम्ही कुठे राहिले? आशिष शेलारांची खोचक टीका

भान सुटलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे:देवेंद्रजी कुठे आहेत आणि तुम्ही कुठे राहिले? आशिष शेलारांची खोचक टीका

आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते की, देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. यावरून आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने...

भारत सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल:मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; देशाचे 24% स्टार्टअप महाराष्ट्रात – एकनाथ शिंदे

भारत सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल:मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; देशाचे 24% स्टार्टअप महाराष्ट्रात – एकनाथ शिंदे

भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले....

पुण्यात तीन पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे:कुलुपे तोडून १९ लाखांचे दागिने व लॅपटॉप चोरीला

पुण्यात तीन पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे:कुलुपे तोडून १९ लाखांचे दागिने व लॅपटॉप चोरीला

पुणे शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. पण पोलिसांना या घटनांवर अंकुश लावण्यात अपयश येत आहे. विविध घरफोडी गुन्ह्याच्या घटनेत चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून १९ लाखांचा मुद्देमाल चोरी केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात एका घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी सात...

पूजा खेडकर प्रकरणात तपास यंत्रणांची संशयास्पद भूमिका:विजय कुंभार यांचा आरोप; अंतरिम जामीन हा न्यायिक प्रक्रिया असल्याचा दावा

पूजा खेडकर प्रकरणात तपास यंत्रणांची संशयास्पद भूमिका:विजय कुंभार यांचा आरोप; अंतरिम जामीन हा न्यायिक प्रक्रिया असल्याचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला जामीन मंजूर केला. त्यांना अंतरिम जामीन किंवा जामीन मिळणे ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. त्याच्या बद्दल काही बोलता येणार नाही. मात्र, या आणि इतरही अशा प्रकरणांत तपास यंत्रणांची भूमिका ही बोटचेपी राहिलेली आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार म्हणाले की, अशा प्रकरणांत तपास यंत्रणा किरकोळ...

खडकवासला धरण परिसरात अपघात:मद्यधुंद रिक्षाचालकाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

खडकवासला धरण परिसरात अपघात:मद्यधुंद रिक्षाचालकाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहराजवळ खडकवासला धरण परिसरात एका भरधाव रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक राेहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवाला,पुणे)असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला,पुणे) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात...