अकरावी प्रवेशाला सुरुवात:पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ
अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळपासून सुरू झाली, मात्र प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असून लवकरच ते सुरळीत सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली. यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यभरातून 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात एकूण 20,91,390...