Category: marathi

सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे?:सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे?:सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, पीडित कुटुंबीयांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीला तिच्या सासरच्या कुटुंबीयांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता. तिच्या पती शशांक...

मोदी 200 देश फिरले, पण फायदा झाला नाही:परदेशात जाणारे शिष्टमंडळ म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय राऊत यांची बोचरी टीका

मोदी 200 देश फिरले, पण फायदा झाला नाही:परदेशात जाणारे शिष्टमंडळ म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संजय राऊत यांची बोचरी टीका

भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशांत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पण खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत या शिष्टमंडळाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उपमा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला, पण काहीही फायदा झाला नाही, असेही ते...

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून मान्सूनपुर्व तयारीला वेग:नाल्यांची साफसफाई, सखल भागात पाणी साचू नये यासाठी उपाय योजना

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून मान्सूनपुर्व तयारीला वेग:नाल्यांची साफसफाई, सखल भागात पाणी साचू नये यासाठी उपाय योजना

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने मान्सूनपुर्व तयारीने वेग घेतला असून सर्व प्रथम सखल भागातील नाल्यांच्या साफसफाई सोबतच या भागात पाणी साचू नयेयासाठी आवश्‍यक उपाय योजना केल्या जात आहे. या शिवाय नदी काठच्या भागांवर पालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. हिंगोली शहरातील महादेववाडी, मस्तानशहा नगर, बावनखोली यासह इतर भागात कयाधू नदीच्या काठी येतो. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागात पाणी शिरल्याने...

वटकळीकरांचं शोले स्टाईल आंदोलन:जलजीवन मिशनच्या चौकशीसाठी ग्रामस्थ चढले पाण्याच्या टाकीवर

वटकळीकरांचं शोले स्टाईल आंदोलन:जलजीवन मिशनच्या चौकशीसाठी ग्रामस्थ चढले पाण्याच्या टाकीवर

सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जल जीवन मिशनच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी गावकऱ्यांनी बुधवारी ता. 21 सकाळी जलकुंभावर जाऊन शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने एक पथक वटकळी कडे रवाना केले आहे. तर पोलिसांचे पथकही गावात दाखल झाले आहे. सेनगाव तालुक्यातील वटकळी हे 5000 लोकसंख्येचे गाव असून गावात...

ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिवसैनिकांवर चॉपरने हल्ला:शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घडला प्रकार; घटना CCTV कैद

ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिवसैनिकांवर चॉपरने हल्ला:शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घडला प्रकार; घटना CCTV कैद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात शिवसैनिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 शिवसैनिक जखमी झाले असून, त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. मारहाणीची संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुधीर कोकाटे...

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर!:21 ते 24 मे – काळजी घ्या! राज्यात वादळसदृश पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची आर्थिक होरपळ

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर!:21 ते 24 मे – काळजी घ्या! राज्यात वादळसदृश पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची आर्थिक होरपळ

अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रवातामुळे महाराष्ट्रात हवामान बिघडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, 21 ते 24 मे दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मुंबई, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान...

आता 200 रुपयातच होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी:राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

आता 200 रुपयातच होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी:राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे. अवघ्या 200 जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. 200 रुपये शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे...

छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल:त्यांना खूप अनुभव, जयंत पाटलांचा सरकारला खोचक सल्ला

छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल:त्यांना खूप अनुभव, जयंत पाटलांचा सरकारला खोचक सल्ला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत ही चांगली गोष्ट झाल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत त्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी पालकमंत्री पद देखील देण्यात यावे अशी मागणी केली आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवर...

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा…   

भुर्दंड:जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेसाठी‎रोज मोजावे लागतात 10,571‎, खासगी यंत्रणेला 25,79,362 रुपयांचे वार्षिक कंत्राट‎

भुर्दंड:जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेसाठी‎रोज मोजावे लागतात 10,571‎, खासगी यंत्रणेला 25,79,362 रुपयांचे वार्षिक कंत्राट‎

अमरावती जिल्हा परिषदेत नियमित परिचर नाही. नोकर भरतीची मुभा नसल्यामुळे त्यांची भरतीही करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने २५ लाख ७९ हजार ३६२ रुपयांचा वार्षिक कंत्राट दिला आहे. या कंत्राटानुसार मुख्यालयाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला रोज १० हजार ५७१ रुपये मोजावे लागत आहेत. इतर कार्यालयांच्या तुलनेत स्वच्छतेवरील हा खर्च खूप जास्त असून त्यापेक्षा नियमित परिचराची नियुक्ती केल्याने हा खर्च...