Category: marathi

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहणार:पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार‎

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहणार:पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार‎

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास आपले प्राधान्य राहणार आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले. पोलिस आयुक्त चावरिया यांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रभारी पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. पुणे येथे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत असलेले अरविंद चावरिया यांची चार दिवसांपूर्वी अमरावती पोलिस आयुक्त म्हणून बदली...

अंजनगावात बनावट कपाशी बियाणे जप्त:कृषी अधिकाऱ्यांनी केली फिल्मी स्टाईल कारवाई, 2.44 लाखांचा माल जप्त, मुख्य सूत्रधार गुलदस्त्यात‎

अंजनगावात बनावट कपाशी बियाणे जप्त:कृषी अधिकाऱ्यांनी केली फिल्मी स्टाईल कारवाई, 2.44 लाखांचा माल जप्त, मुख्य सूत्रधार गुलदस्त्यात‎

जिल्ह्यात अवैध कापूस बियाणे दाखल होताच त्यासंबंधी कृषी विभागाने कारवाई सत्र सुरू केले आहे. या अंतर्गतच अंजनगाव सुर्जीतील देवनाथ नगरात सोमवारी कारवाई करत २ लाख ४४३८७ रुपये किमतीचे विक्रीची परवानगी नसलेले १७४ पॅकेट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले. तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असून, बनावट एचटीबीटी कापूस बियाणेप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद वा. सरोदे (५४) हा बऱ्याच दिवसांपासून एचटीबीटी...

आश्वासनपूर्ती:क्रिकेटपटू जितेश शर्माकडून गुणवंतांना बक्षीस, रहाटगावच्या प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना 60 हजारांचा रोख पुरस्कार‎

आश्वासनपूर्ती:क्रिकेटपटू जितेश शर्माकडून गुणवंतांना बक्षीस, रहाटगावच्या प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना 60 हजारांचा रोख पुरस्कार‎

गणराज्य दिनी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माने मनपा क्षेत्रातील रहाटगाव येथील प्रगती विद्यालयातील दहावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार प्रदान करण्याचे घोषित केले होते. जितेश सध्या आरसीबीकडून आयपीएल खेळण्यात व्यस्त असतानाही त्याने प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचा शब्द पाळत शाळेसोबत त्याच्या कुटुंबाचे असलेले संबंध आणखी घट्ट केले. जितेशच्या चार मावशी प्रगती विद्यालयात शिकल्या. तसेच त्याचे वडील...

‘हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिये’चा निनादला सूर:”सिंदूर”च्या यशानंतर सन्मानार्थ नांदगाव पेठ येथे तिरंगा रॅली‎

‘हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिये’चा निनादला सूर:”सिंदूर”च्या यशानंतर सन्मानार्थ नांदगाव पेठ येथे तिरंगा रॅली‎

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन...

मंत्रिमंडळ बैठक:70 हजार कोटी खर्चून राज्यात 5 वर्षांत 35 लाख गरिबांसाठी घरे, नव्या गृहनिर्माण धोरणासह उद्योग क्षेत्रात 93,317 रोजगार संधी देणाऱ्या 325 प्रकल्पांना मंजुरी

मंत्रिमंडळ बैठक:70 हजार कोटी खर्चून राज्यात 5 वर्षांत 35 लाख गरिबांसाठी घरे, नव्या गृहनिर्माण धोरणासह उद्योग क्षेत्रात 93,317 रोजगार संधी देणाऱ्या 325 प्रकल्पांना मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीदवाक्य असलेल्या “राज्य गृहनिर्माण धोरण २०२५’ ला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणानुसार येत्या ५ वर्षांत राज्यात ३५ लाख सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडणारी घरे बांधली जातील. यावर किमान ७० हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बैठकीत याशिवाय उद्योग क्षेत्रात ९३,३१७ रोजगार संधी देणाऱ्या ३२५...

नांदेड परिमंडळात 292 वीज चोरांवर कारवाई:4.93 लाख युनीट वीज चोरी केल्याचे उघड, 65 लाख 36 हजारांचा दंड वसूल

नांदेड परिमंडळात 292 वीज चोरांवर कारवाई:4.93 लाख युनीट वीज चोरी केल्याचे उघड, 65 लाख 36 हजारांचा दंड वसूल

वीज वितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीच्या पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरुध्द धडक मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत २९२ जणांवर कारवाई करून ६५.३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरी करणाऱ्या विरोधातील मोहिम यापुढेही कायम राहणार असल्याचे वीज कपंनीच्या सूत्रांनी सांगितले. नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस...

तारकुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू:कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल, ढोलक्याचीवाडी शिवारातील घटना

तारकुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू:कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल, ढोलक्याचीवाडी शिवारातील घटना

कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी शिवारात वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या तार कुंपणाच्या विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी तारीख 20 सायंकाळी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढोलक्याचीवाडी शिवारामध्ये रोही, रानडुक्कर या प्राण्यांची संख्या अधिक आहे. कळपाने राहणारे प्राणी शेतामध्ये येऊन पिकांची नासधूस करीत आहेत. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी...

लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी:पिकांना मोठा फटका, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान

लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी:पिकांना मोठा फटका, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान

लाखांदूर तालुक्यात २० मे रोजी अचानक आलेल्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील बहुतांश भागात शेत पिकाची व विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने तालुक्यातील बहुतांश मार्ग काही वेळापुरते बंद झाले होते. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिंचोली/अंतरगाव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी केलेले धान व मळणी झालेल्या धानाची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. रस्त्यावरील...

मुसळधार पावसाने सातारा परिसराला झोडपले:आंबा पिकाचे मोठे नुकसान, कास रोडवर मोबाईल टॉवर कोसळून 1 जण जखमी

मुसळधार पावसाने सातारा परिसराला झोडपले:आंबा पिकाचे मोठे नुकसान, कास रोडवर मोबाईल टॉवर कोसळून 1 जण जखमी

गेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणाऱ्या अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही साताऱ्याला झोडपून काढले. सायंकाळी सव्वा सहा पासून वादळी पावसाने सातारकरांची दैना उडवली. कास यवतेश्वर रस्त्यावर एक मोबाईल टॉवर चारचाकी वाहनावर पडून दोनजण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसा पासून सातारा शहर व परिसराचा वळीवाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सोमवारी रात्री ही पावसाचे जोरदार स्वरूपात आगमन...

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हजेरी:पुण्यात होर्डिंग कोसळले, नाशिकमध्ये झाड उन्मळून पडले; जळगावात 4 म्हशी ठार

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हजेरी:पुण्यात होर्डिंग कोसळले, नाशिकमध्ये झाड उन्मळून पडले; जळगावात 4 म्हशी ठार

राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे विविध भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठे झाडं कोसळली, कुठे मोबाईल टॉवर जमीनदोस्त झाला, तर कुठे पत्र्याची छते उडाली. काही ठिकाणी वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक अशा प्रमुख जिल्ह्यांसह कोकण, पश्चिम...