नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला होता दावा
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एका कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान हिरा हरवला. नारळीकरांनी आपले संशोधन कार्य करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंबंधीची सुप्रसिद्ध बिगबँग थेअरी नाकारली. यासाठी त्यांनी दिलेले युक्तिवाद अत्यंत चपखल असे मानले जातात. त्यांनी 2017 मध्ये ‘कलाचूवाडू’ या तामिळी मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत यासंबंधी आपले विस्तृत मत मांडले होते. जयंत नारळीकर यांना या मुलाखतीत विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी एक प्रश्न...