राहुल गांधींचा आरक्षणावरील खरा चेहरा उघड:त्यांच्या मनातील गोष्ट तोंडात आली, फडणवीस यांचा आरक्षण संपवण्याच्या मुद्यावर घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांच्या मनातील गोष्ट आता तोंडात आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हीच त्यांची खरी भूमिका असून, त्यांचा हाच खरा चेहरा आहे, असे ते म्हणालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडे पाहता तेव्हा आदिवासींना 100 रुपयांतून केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 100 रुपयांतून केवळ 5 रुपये मिळतात. ओबीसींनाही जवळपास एवढाच वाटा मिळतो. भारतातील बिझनेस लिडर्सची यादी पाहिली तर टॉप 200 मध्ये केवळ 1 ओबीसी आहे. वस्तुतः त्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांवर आहे. पण आम्ही या आजारावर कोणताही उपचार करत नाही, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हाच संसदेपर्यंत पोहोचू दिले नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यांनी मुद्दाम भंडाऱ्यात विरोधात उमेदवार देऊन हरवले. त्यांनी मुंबईतही त्यांच्याशी तसाच व्यवहार केला. त्यांनी वारंवार त्यांचा अवमान केला. हे लोक भारताच्या संविधानाला केव्हाही ज्या नजरेने पाहण्याची गरज असते त्या नजरेने पाहत नाहीत. केवळ राजकीय टूल म्हणून त्यांनी संविधानाचा वापर केला. आता त्यांच्या मनातील गोष्ट ओठांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षणावरून धरले होते कोंडीत उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने आरक्षण व संविधानाच्या मुद्यावरून सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडले होते. मोदी सरकार आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नांत असून, त्यासाठी त्यांना 400 जागा हव्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता स्वतः राहुल गांधी यांनीच काँग्रेस योग्यवेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेईल असे विधान करून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयते कोलित दिले आहे. अमित शहांनीही साधला निशाणा दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याच्या विधानांतून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार दिसतात. त्यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांच्या मनातील गोष्ट आता तोंडात आली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर हीच त्यांची खरी भूमिका असून, त्यांचा हाच खरा चेहरा आहे, असे ते म्हणालेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल यांनी कळीच्या आरक्षणाच्या मुद्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही. तुम्ही आर्थिक आकडे पाहता तेव्हा आदिवासींना 100 रुपयांतून केवळ 10 पैसे मिळत आहेत. दलितांना 100 रुपयांतून केवळ 5 रुपये मिळतात. ओबीसींनाही जवळपास एवढाच वाटा मिळतो. भारतातील बिझनेस लिडर्सची यादी पाहिली तर टॉप 200 मध्ये केवळ 1 ओबीसी आहे. वस्तुतः त्यांची संख्या मात्र 50 टक्क्यांवर आहे. पण आम्ही या आजारावर कोणताही उपचार करत नाही, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हाच संसदेपर्यंत पोहोचू दिले नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्यांनी मुद्दाम भंडाऱ्यात विरोधात उमेदवार देऊन हरवले. त्यांनी मुंबईतही त्यांच्याशी तसाच व्यवहार केला. त्यांनी वारंवार त्यांचा अवमान केला. हे लोक भारताच्या संविधानाला केव्हाही ज्या नजरेने पाहण्याची गरज असते त्या नजरेने पाहत नाहीत. केवळ राजकीय टूल म्हणून त्यांनी संविधानाचा वापर केला. आता त्यांच्या मनातील गोष्ट ओठांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आरक्षणावरून धरले होते कोंडीत उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने आरक्षण व संविधानाच्या मुद्यावरून सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडले होते. मोदी सरकार आरक्षण संपवण्याच्या प्रयत्नांत असून, त्यासाठी त्यांना 400 जागा हव्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता स्वतः राहुल गांधी यांनीच काँग्रेस योग्यवेळी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेईल असे विधान करून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयते कोलित दिले आहे. अमित शहांनीही साधला निशाणा दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याच्या विधानांतून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार दिसतात. त्यांनी आरक्षण रद्द करण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.