महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान पवार कुटुंबात गतकाही वर्षांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या लढाईत आतापर्यंत शरद पवारांनी आपले वर्चस्व राखले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. पण अजित पवारांनी राजकीय सारिपाटावर मांडलेल्या सोंगट्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडतील असे चित्र आहे. यामुळेच ते काहीसे बदलल्याचे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपशी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत कठोर झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात चक्क आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश-पाताळ एक केले. पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनक राहिली. दुसरीकडे, शरद पवारांच्या नव्या पक्षाने चमकदार कामगिरी केली. तेव्हापासून अजित पवार त्यांच्याप्रती काहीसे मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. रविवारी बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. अखेर अजित पवारांच्या मनात काय? अजित पवारांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबरच जनतेचीही मने जिंकता येतील असा विश्वास होता. त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट लोकसभा निवडणूक होती. पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे भाजप व शिवसेनेसोबत असताना त्यांना पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे व्हायचे नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यांना माहिती आहे की, शरद पवार आता वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचलेत, जिथे 2029 च्या निवडणुकीत ते फारसे सक्रिय राहण्याची आशा नाही. त्यामुळे त्यावेळी शरद पवारांचे चाहते व समर्थक आपल्याकडे वळतील असे त्यांना वाटते. त्यामुळेच अजित पवार शरद पवारांच्या मार्गाने जात मध्यम मार्गाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते वक्फ बोर्डाच्या मुद्यावर मुस्लिमांसोबत दिसून येतात, तर राम मंदिरापासून सर्वच राष्ट्रीय मुद्यांवर भाजपसोबत असल्याचे दाखवून देतात. विशेषतः असे करताना त्यांना शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातही जायचे नाही. त्यामुळेच ते आपली चूक झाल्याचे मान्य करत शरद पवारांच्या समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच मान्य केली होती चूक अजित पवार यांनी नुकतीच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या एका सभेत आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांना वडिलांशी फितुरी न करण्याचा सल्ला दिला होता. ते भाग्यश्रीला म्हणाले होते की, गुरू कधीही शिष्याला सर्व डावपेच शिकवत नाही, तो नेहमी एक डाव राखून ठेवतो. मला तुला अशी चूक करू नको, वडिलांसोबत राहा असा सल्ला देतो. वडील आपल्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढे प्रेम कुणी कुणावर करत नाही. असे केल्याने तू तुझ्याच घरात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरशील. हे योग्य नाही. ते समाजाला पटत नाही. या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतला आहे. मला आता माझी चूक समजली आहे. ती चूक मला मान्यही आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघात आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत भाग्यश्रीला उपरोक्त सल्ला देत होते. मग जय पवारांचे नाव चर्चेत का? अजित पवार यांनी बारामती येथील जागा आपले सुपुत्र जय पवार यांना सोडण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजिव आहेत. म्हणजे, बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित व श्रीनिवास या बंधूंमध्ये मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी गतवर्षी आपले चुलते शरद पवारांशी बंडखोरी केल्यानंतर जय पवार पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आले होते. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या पहिल्या सभेतही ते अजित पवारांसोबत दिसून आले होते. दुसरीकडे, युगेंद्र पवारही गत वर्षभरापासून शरद पवारांसोबत फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुप्रिया सुळेंविषयीही व्यक्त केली होती सहानुभूती अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी सॉफ्ट भूमिका व्यक्त केली होती. ‘राजकारणाच्या जागी राजकारण आहे, पण या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते, पण घरात राजकारण येऊ देऊ नये. पण लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला होता. एकदा निशाणा साधला की बाण परत घेता येत नाही. पण तरीही माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते. दुर्दैवाने आता तो निर्णय मागे घेता येणार नाही’, असे ते म्हणाले होते. बारामतीचा अभेद्य गड जिंकण्याची रणनीती या घटनाक्रमावरून हे स्पष्ट आहे की, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतून धडा घेत यापुढे आपले चुलते शरद पवार व कुटुंबीयांवर आक्रमक भूमिका न घेता अत्यंत शांतपणे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. बारामती वगळता ते एकप्रकारे शरद पवार यांच्यावर राजकारणातून रिटायर होण्यासठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामु्ळेच त्यांनी आपल्या वयाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांचे वय व महत्त्वकांक्षेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही स्वतः आपला मुलगा व पुतण्यासाठी आपली जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. आता शरद पवारांनी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याला बारामतीतून उमेदवारी दिली तरी अजित पवार नैतिकदृष्ट्या शरद पवारांच्या पुढे असतील. यामाध्यमातून ते कौटुंबिक आघाडीवरील बारामतीच्या लढाईत आपल्या काकांना मात देतील.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान पवार कुटुंबात गतकाही वर्षांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या लढाईत आतापर्यंत शरद पवारांनी आपले वर्चस्व राखले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. पण अजित पवारांनी राजकीय सारिपाटावर मांडलेल्या सोंगट्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडतील असे चित्र आहे. यामुळेच ते काहीसे बदलल्याचे दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपशी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत कठोर झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात चक्क आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश-पाताळ एक केले. पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनक राहिली. दुसरीकडे, शरद पवारांच्या नव्या पक्षाने चमकदार कामगिरी केली. तेव्हापासून अजित पवार त्यांच्याप्रती काहीसे मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. रविवारी बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. अखेर अजित पवारांच्या मनात काय? अजित पवारांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबरच जनतेचीही मने जिंकता येतील असा विश्वास होता. त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट लोकसभा निवडणूक होती. पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले. पण याहून मोठी गोष्ट म्हणजे भाजप व शिवसेनेसोबत असताना त्यांना पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे व्हायचे नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यांना माहिती आहे की, शरद पवार आता वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचलेत, जिथे 2029 च्या निवडणुकीत ते फारसे सक्रिय राहण्याची आशा नाही. त्यामुळे त्यावेळी शरद पवारांचे चाहते व समर्थक आपल्याकडे वळतील असे त्यांना वाटते. त्यामुळेच अजित पवार शरद पवारांच्या मार्गाने जात मध्यम मार्गाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच ते वक्फ बोर्डाच्या मुद्यावर मुस्लिमांसोबत दिसून येतात, तर राम मंदिरापासून सर्वच राष्ट्रीय मुद्यांवर भाजपसोबत असल्याचे दाखवून देतात. विशेषतः असे करताना त्यांना शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातही जायचे नाही. त्यामुळेच ते आपली चूक झाल्याचे मान्य करत शरद पवारांच्या समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच मान्य केली होती चूक अजित पवार यांनी नुकतीच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या एका सभेत आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांना वडिलांशी फितुरी न करण्याचा सल्ला दिला होता. ते भाग्यश्रीला म्हणाले होते की, गुरू कधीही शिष्याला सर्व डावपेच शिकवत नाही, तो नेहमी एक डाव राखून ठेवतो. मला तुला अशी चूक करू नको, वडिलांसोबत राहा असा सल्ला देतो. वडील आपल्या मुलीवर जेवढे प्रेम करतात तेवढे प्रेम कुणी कुणावर करत नाही. असे केल्याने तू तुझ्याच घरात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरशील. हे योग्य नाही. ते समाजाला पटत नाही. या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतला आहे. मला आता माझी चूक समजली आहे. ती चूक मला मान्यही आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघात आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत भाग्यश्रीला उपरोक्त सल्ला देत होते. मग जय पवारांचे नाव चर्चेत का? अजित पवार यांनी बारामती येथील जागा आपले सुपुत्र जय पवार यांना सोडण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटातील सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजिव आहेत. म्हणजे, बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित व श्रीनिवास या बंधूंमध्ये मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी गतवर्षी आपले चुलते शरद पवारांशी बंडखोरी केल्यानंतर जय पवार पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आले होते. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या पहिल्या सभेतही ते अजित पवारांसोबत दिसून आले होते. दुसरीकडे, युगेंद्र पवारही गत वर्षभरापासून शरद पवारांसोबत फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुप्रिया सुळेंविषयीही व्यक्त केली होती सहानुभूती अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी सॉफ्ट भूमिका व्यक्त केली होती. ‘राजकारणाच्या जागी राजकारण आहे, पण या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते, पण घरात राजकारण येऊ देऊ नये. पण लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला होता. एकदा निशाणा साधला की बाण परत घेता येत नाही. पण तरीही माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते. दुर्दैवाने आता तो निर्णय मागे घेता येणार नाही’, असे ते म्हणाले होते. बारामतीचा अभेद्य गड जिंकण्याची रणनीती या घटनाक्रमावरून हे स्पष्ट आहे की, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतून धडा घेत यापुढे आपले चुलते शरद पवार व कुटुंबीयांवर आक्रमक भूमिका न घेता अत्यंत शांतपणे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. बारामती वगळता ते एकप्रकारे शरद पवार यांच्यावर राजकारणातून रिटायर होण्यासठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यामु्ळेच त्यांनी आपल्या वयाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांचे वय व महत्त्वकांक्षेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही स्वतः आपला मुलगा व पुतण्यासाठी आपली जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. आता शरद पवारांनी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र याला बारामतीतून उमेदवारी दिली तरी अजित पवार नैतिकदृष्ट्या शरद पवारांच्या पुढे असतील. यामाध्यमातून ते कौटुंबिक आघाडीवरील बारामतीच्या लढाईत आपल्या काकांना मात देतील.