जनगणना:जातनिहाय जनगणना 1 मार्च 27 पासून, एका वर्षात अंतरिम माहिती, जगातील सर्वात मोठी प्रशासकीय कार्यवाही

केंद्र सरकारने देशात १६ वर्षांनंतर होणाऱ्या बहुप्रतीक्षित जनगणनेची तारीख जाहीर केली. ती १ मार्च २०२७ रोजी सुरू होईल आणि ती दहा वर्षांसाठी वैध असेल. गृह मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, जातींच्या गणनेसह जनगणना-२०२७ दोन टप्प्यांत केली जाईल. पहिला टप्पा मार्च २०२७ पासून सुरू होईल. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या बर्फाळ प्रदेशात ही जनगणना ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू होईल. ही जगातील सर्वात मोठी प्रशासकीय कार्यवाही असेल. अधिसूचना १६ जून २०२५ रोजी जारी हाेईल. १ एप्रिल २०२७ पासून ४५ दिवसांपर्यंत घर मोजणी हाेईल. जातीय जनगणनेसाठी अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा आवश्यकता असेल. या कायदेशीर पूर्ततांसाठी संसदेच्या आगामी सत्रात विधेयक मांडणे शक्य आहे. जून २०२६ मध्ये प्रशासकीय सीमा बंद करण्याची अधिसूचना निघेल. त्यानंतर तीन महिन्यांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये जनगणना सुरू होईल. तुम्हाला माहीत असावे असे सर्वकाही २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन, काँग्रेसचा आरोप – पहिल्यांदाच ४७ दिवस आधीच घोषणा : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, २३ दिवसांत अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर, मुद्द्यांवर चर्चा होईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की, प्रथमच ४७ दिवस आधी अधिवेशनाची घोषणा झाली. कारण सरकारला विशेष अधिवेशन नकाेय. या प्रक्रियेला किती वेळ लागेल? जवळपास तीन वर्षे. २०२७ च्या जनगणनेची अंतिम आकडेवारी जवळपास २०३० मध्ये प्रकाशित केली जाईल. घरोघरी मोजणी कधी होईल? ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२८ पर्यंत २१ दिवस चालेल. १ मार्च ते ५ मार्च २०२८ पर्यंत उजळणी फेरी (रिव्हिजन राउंड) होईल. हे काम २८ फेब्रुवारी २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. किती जिल्हे, तालुके समाविष्ट? जनगणनेच्या कक्षेत ७०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील ८ हजार शहरे आणि ६०० तालुक्यांत प्रक्रिया पार पडेल. आकडेवारी कधीपर्यंत मिळेल? जनगणनेची तात्पुरती आकडेवारी मार्च २०२८ मध्ये मिळू शकते. त्यानंतर लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना सुरू करता येईल. यावर महिलांसाठी ३३% जागा आरक्षित करण्याचा मार्ग मोकळा होईल. घर मोजणीचे प्रश्न कसे? घर पक्के की कच्चे? भिंतींचे बांधकाम कशाचे? छत कशाचे? घरात किती खोल्या? किती विवाहित जोडपी? पाण्याचा स्रोत काय? घरात शौचालय आहे का? मैलापाणी व्यवस्थापनाची सोय काय आहे? स्वयंपाकघर आहे की नाही? स्वयंपाकाची साधने काय आहेत? घरात रेडिओ, टीव्ही, वायफाय, इंटरनेट, मोबाइल फोन, सायकल, स्कूटर, कार आहे का? असे अनेक प्रश्न असतील.