हिंगोलीत गावठी पिस्टलने दहशत निर्माण करणारा अटकेत:शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई, गावठी पिस्टल केले जप्त

हिंगोलीत गावठी पिस्टलने दहशत निर्माण करणारा अटकेत:शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई, गावठी पिस्टल केले जप्त

हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज भागात गावठी पिस्टल घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एकास हिंगोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने सोमवारी ता. १९ सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली शहरासह जिल्हाभरात शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी ठाणेदारांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हे शाखेचे तीनपथके तयार केली आहेत. या शिवाय जिल्हयातील १३ पोलिस ठाण्यांतर्गत पथके कार्यरत केली आहेत. दरम्यान, हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज भागात एक तरूण परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर, मुजीब पठाण, गणेश वाबळे, गणेश लेकुळे, संतोष करेे, अझर पठाण यांच्या पथकाने तातडीने आदर्श कॉलेज परिसरात धाव घेतली. पोलिसांनी त्या परिसरात तरुणाचा शोध घेतला. पोलिसांनी एका तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नांव भूषण खिल्लारे असल्याचे सांगितले. पोलिसांनी भूषण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील २५००० रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ही वाचा… भरधाव टिप्परच्या धडकेत दोन भावाचा मृत्यू:चौघे जखमी, हिंगोलीच्या कोपरवाडी शिवारातील घटना कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी शिवारात भरधाव टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुपटी येथील दोन सख्या भावाचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 18 रात्रीच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा… पिंपळखुटा तलावासाठी रात्रीच्या वेळी ब्लास्टींग:चार ते पाच घरांना गेले तडे, एक जण जखमी; गावकऱ्यांनी काम पाडले बंद हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा तलावासाठी कंत्राटदाराने रात्रीच्या वेळी ब्लास्टींग केली असून यामुळे परिसरातील चार ते पाच घरांना तडे गेल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी काम बंद पाडले. तर दुसरीकडे रविवारी ता. १८ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला समज देण्याऐवजी गावकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले आहे. या प्रकारामुळे आता गावकरी अन् जलसंपदा विभागात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पूर्ण बातमी वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment