महाराष्ट्र पोलिस राजकारणाच्या दबावात:हगवणे प्रकरणात राऊत संतापले; तर फडणवीस खोतकरांना वाचवत असल्याचाही आरोप

महाराष्ट्र पोलिस राजकारणाच्या दबावात:हगवणे प्रकरणात राऊत संतापले; तर फडणवीस खोतकरांना वाचवत असल्याचाही आरोप

महाराष्ट्रातील पोलिस खाते, प्रत्येक पोलिस चौकी, प्रत्येक पोलिस स्टेशन राजकारणाच्या दबावाखालीच काम करते. हुंडाबळीच्या केसेस देखील दबावाखाली चालवल्या जात असतील, आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील राजकारणात अडकलेल्या असतील, तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांना अशा घटनांचे गांभीर्य नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला. गृहमंत्र्यांच्या कार्यकाळात अशा अनेक घटना घडल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. काल धुळ्यामध्ये पाच कोटी रुपये सापडले, तिकडे ईडी का पोहोचली नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाच-पन्नास हजारांची चौकशी ईडी करते, मग काल विधिमंडळ समितीच्या अध्यक्षांच्या पीएकडे पाच कोटी रुपये सापडले, तिथे ईडी का पोहोचली नाही? तिथे विरोधी पक्षाचा कोणी असते तर ईडीच्या अधिकारी कोट आणि टाय लावून तेथे पोहोचले असते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. ईडी म्हणजे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या पिंजऱ्यातील पोपट आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अंदाज समितीच्या अधिकाऱ्याच्या खोलीत सापडलेल्या रक्कम प्रकरणात एसआयटी स्थापन केल्या पेक्षा गुन्हा दाखल केला असता, पीएला ताब्यात घेतले असते, तपास ईडीकडे वर्ग केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता. अशा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. या प्रकरणात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस हे अर्जुन खोतकर यांना वाचवत आहे का? याचा खुलासा व्हायला हवा, असे देखील ते म्हणाले. मोठी रक्कम जमा करण्याचे टार्गेट होते या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला काल मर्यादा का नाही? त्यांच्या तपासाच्या चौकटी काय आहेत? ते अद्याप आम्हाला समजलेले नाही. त्यांच्या कालावधीमध्ये ही समिती ज्या – ज्या ठिकाणी गेली, तेथे ते कोणत्या हॉटेलमध्ये किंवा विश्रामगृहात याच महाशयांनी आपल्या बॉस साठी पैसे जमा केले, याची माहिती फडणवीस यांना हवी असेल तर ती मी त्यांना द्यायला तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन कोटी रक्कम तर शुल्लक आहे. यापेक्षा मोठी रक्कम जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे, खोतकरांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो सदरील प्रकरणात आरोपी घाई घाईत रक्कम घेऊन पाळला होता. त्यावेळी जाताना त्याने गाडीमध्ये बॅगा टाकल्या. साडेपाच कोटी रुपये तो घेऊन गेला होता, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. पाच ते साडेपाच कोटी जमा करायचे होते. उरलेली रक्कम जालन्यात जमा करायची होती. कदाचित ती जमा झाली असेल. मात्र केवळ उरलेली रक्कम हाती लागली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. चोर कधी चोरी कबूल करत नाही. त्यामुळे हे सर्व चोर आहेत, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमके बोट ठेवले असल्याचा आरोप गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी, अमित शहा, संजय मिश्रा, देवेंद्र फडणवीस या लोकांनी ईडी सारख्या संस्थेचा राजकीय गैरवापर केला आहे. आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी, त्यांचे पक्ष फोडण्यासाठी हा वापर करण्यात आला. तसेच राजकीय खंडणी गोळा करण्यासाठी देखील ईडीचा गैरवापर करण्यात आला आहे. मात्र, आता ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याच्यावर काल सर्वोच्च न्यायालयाने नेमके बोट ठेवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment