मराठी भाषेचा करतो अपमान, कुठं फेडशील हे पाप!:मनसेचा कवितेतून प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल, पुण्यात लावले बॅनर

मराठी भाषेचा करतो अपमान, कुठं फेडशील हे पाप!:मनसेचा कवितेतून प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल, पुण्यात लावले बॅनर

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या “हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे” या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. हिंदी ही आपली लाडकी बहीण असल्याचेही ते म्हणाले होते. वाद सुरू होताच सरनाईक यांनी यू-टर्न घेत मराठी भाषेचाच मी सर्वाधिक सन्मान केल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनर झळकावत प्रताप सरनाईक यांच्यावर कवितेच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे. मनसेच्या वतीने ‘मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येणारा तू तर दुतोंडी साप, मराठी भाषेचा अपमान करतोय कुठे फेडशील हे पाप,’ अशा आशयाचे बॅनर पुण्यात लावण्यात आले. हा बॅनर प्रमुख आकर्षण ठरत असून लक्ष वेधून घेत आहे. मनसेची कविता काय? मराठी भाषेचा करतो अपमान असा कसा तुझा प्रताप !
आम्ही तर मराठीचे पाईक, आपण कसले नाईक !
मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येणारा तू तर दूतोंडी साप !
मराठी भाषेचा अपमान करतोय, कुठं फेडशील हे पाप ||
मातृभाषेची सर ! नसलेल्या महाराष्ट्रद्रोह्याला नाही मराठी भाषेची जाण
जन्म आमचा मराठी, भाषेची अस्मिता आभिमानाने सांगणे हेच आमचे नवनिर्माण… नेमके काय म्हणाले होते प्रताप सरनाईक? मिरा रोड भागातील एका कार्यक्रमात बोलताना, हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याही पुढे जाऊन त्यांनी हिंदी भाषेला थेट लाडक्या बहिणीचा दर्जा दिला होता. दरम्यान, राज्यात आधीच हिंदी मराठी वाद सुरू आहे, त्यात प्रताप सरनाईक यांच्या या विधानामुळे आणखी भर पडली आहे. सरनाईकांवर विरोधकांकडून टीका सरनाईक हे भाजपचे धोरण राबवत आहेत. त्यांना मराठी संपवून हिंदी, हिंदू राष्ट्र करायचे आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात सगळ्यात आधी काँग्रेसने आवाज उठवला, त्यानंतर अन्य पक्षांनी भूमिका घेतली, असा दावा करत सपकाळ पुढे म्हणाले की, अमित शाह हेच राज्याचे खरे मुख्यमंत्री असून राज्यात कठपुतळीचा खेळ सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हा विचार भाजपचा आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. हे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना विचारा की, त्यांचीही हीच भूमिका आहे का? हा विचार भाजपचा, अमित शाह यांचा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरनाईकांवर केली. भाजपकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न सरनाईक यांच्यासमोर हिंदी वर्ग बसला असेल, त्यामुळे ते हिंदीबाबत बोलले असतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याने सरनाईक मराठीच्या विरोधात आहेत, असे मानण्याचे काही कारण नाही, अशी सारवासारव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment