मराठवाडा आणि विदर्भातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

बोगस बियाण्यांचे प्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. खत कंपन्या सक्ती करत असतील, तर कारवाई करा, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच विभागीय बदल्या आणि पद भरती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना केल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदे सर्वात आधी भरा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील पदे शेवटी भरा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. राज्यशासनाची खरीप हंगामाची नियोजन बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषि राज्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. शासनाचे वरीष्ठ अधिकारी, आएमडीएचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हे देखील या बैठकीला उपस्थित होते. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…