मंत्रालय, विधिमंडळ अदानीला कधी देणार?:काँग्रेसचा संतप्त सवाल; भाजप अदानीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप

राज्यातील मंत्रालय आणि विधिमंडळ देखील अदानीला देण्याचे बाकी राहिले आहे. ते कधी देणार? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील भाजप महायुती अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मुंबईतील विमानतळ तसो की धारावी मधील पुर्ण विकास प्रकल्प अदानीला देण्यात आला आहे. यावरून काँग्रेस आधीपासूनच भारतीय जनता पक्षावर टीका करत आहे. आता त्यात एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागा देखील अदानीला देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. यावरून आता हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट देखील पहा… या संदर्भात सपकाळ यांनी पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी लिहिले की, भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार? मोदींनी दिलेल्या 16 आश्वासनांचे काय झाले? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आणखी एका पोस्टच्या माध्यमातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला देखील प्रश्न विचारला आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या 16 आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.