मोठी सुरुवात:कटरा-श्रीनगर सध्या एकच रेल्वे, सप्टेंबरमध्ये दिल्लीहून, सुरक्षेच्या कारणास्तव दिवसा धावणार गाड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी कटरा ते श्रीनगरला जोडणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. सध्या कटरा ते श्रीनगरसाठी एकच रेल्वे धावेल. नवी दिल्लीहून थेट श्रीनगरसाठीची रेल्वेसेवा सप्टेंबरमध्ये सुरू होऊ शकते. नॉर्दर्न रेल्वेचे श्रीनगरचे मुख्य क्षेत्र व्यवस्थापक साकिब युसूफ यांनी सांगितले की, दिल्ली-कटरादरम्यान ६ रेल्वे आहेत. जर एखाद्याला दिल्लीहून श्रीनगरला जायचे असेल, तर त्याला रात्री १०:१० वाजता दिल्लीतून गाल्टा धाम पूजा एक्स्प्रेस पकडावी लागेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता कटरा येथे पोहोचेल. उत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेस रात्री ८:५० वाजता दिल्लीहून निघून सकाळी ७:३० वाजता कटरा येथे पोहोचते. येथे सकाळी ८:१० वाजता वंदे भारत एक्स्प्रेस मिळेल, जी सकाळी ११:२० वाजता श्रीनगरला पोहोचवेल. २७० किमी मार्गावर ५ हजार सैनिक तैनात कटराहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस २७० किमी दूर श्रीनगरला पोहोचण्यासाठी ३ तास २० मिनिटे घेईल. उद्घाटन समारंभासाठी या मार्गावर ५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. ही रेल्वे ताशी १६० किमीपर्यंत वेगाने धावेल, परंतु चिनाब रेल्वे ब्रिजवर तिचा वेग ताशी ८५ किमी राहील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मार्गावर केवळ दिवसाच रेल्वे धावतील. कटरात हाेणार सामान, ओळखपत्राची कसून तपासणी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने भास्करला सांगितले की, या मार्गावर १७ स्टेशन आहेत. त्यामुळे कटरा येथेच प्रवाशांचे सामान व ओळखपत्र तपासूनच त्यांना ८ डब्यांच्या गाडीत प्रवेश मिळेल. संपूर्ण गाडीत ५३० प्रवासी असतील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment