नाथवाड्यातील रांजण भरण्यास प्रारंभ; ‎भक्त तीन दिवस दररोज टाकणार पाणी‎:पैठण येथे नाथषष्ठीला औपचारिकरीत्या सुरुवात; गुरुवारी मानाची दिंडी‎

नाथवाड्यातील रांजण भरण्यास प्रारंभ; ‎भक्त तीन दिवस दररोज टाकणार पाणी‎:पैठण येथे नाथषष्ठीला औपचारिकरीत्या सुरुवात; गुरुवारी मानाची दिंडी‎

संत एकनाथ महाराज यांच्या‎नाथषष्ठी उत्सवाला रविवारी (दि.‎१६) औपचारिकरीत्या सुरुवात‎झाली. संत तुकाराम महाराज‎बीजनिमित्त नाथवंशजांच्या‎उपस्थितीत एकनाथ महाराज‎यांच्या वाड्यातील पवित्र रांजण‎भरण्यास सुरुवात झाली असून,‎महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित‎राहून रांजणाचे दर्शन घेतले. तीन‎दिवस रोज रांजणात पाणी‎टाकण्यात येणार आहे. दरम्यान,‎गुरूवारी मानाची दिंडी सकाळी ११‎वाजता व शुक्रवारी रात्री छबिना‎मिरवणूक निघणार आहे. शनिवारी‎दहिहंडीचा कार्यक्रम आहे.‎ रांजणाचे वैशिष्ट्य, १२ वर्षे‎येथेच श्रीकृष्णाने भरले पाणी‎
नाथवाड्यात विजयी पांडुरंगाची मूर्ती‎असून, येथेच संत एकनाथ‎महाराजांचे वास्तव्य होते. वाड्यात‎त्यांनी पंक्ती दिल्या. श्रीकृष्णाने‎श्रीखंड्या नाव धारण करून १२ वर्षे‎गोदावरीचे पाणी याच वाड्यातील‎रांजणात भरले. हा रांजण चौकोनी‎असून, त्याचा तळ गोलाकार आहे.‎तुकाराम बीजेला श्रीखंड्या म्हणजेच‎साक्षात पांडुरंग नाथांच्या घरी आले.‎त्याच दिवसापासून भगवान पांडुरंग‎कावडीने गोदावरीचे पाणी आणून‎रांजण भरू लागले. या घटनेला‎साडेचारशे वर्षांहून अधिक काळ‎लोटला आहे.‎

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment