राजस्थान आरोग्यमंत्र्यांच्या पत्नीचा सायलेंट अटॅकने मृत्यू:जयपूरमध्ये जेवण केल्यानंतर झोपी गेल्या आणि सकाळी उठल्याच नाही

राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांच्या पत्नी प्रीती कुमारी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रीती कुमारी जेवण करून झोपी गेल्या होत्या. सकाळी त्या उठल्या नाहीत तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात (दुर्लभजी) नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रीती कुमारी यांना सायलेंट अटॅक आला होता, ज्यामुळे झोपल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सकाळी डॉक्टरांचे एक पथकही मंत्र्यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. १९८२ मध्ये लग्न झाले गजेंद्र सिंह खिंवसार आणि प्रीती कुमारी यांचे लग्न फेब्रुवारी १९८२ मध्ये झाले होते. त्यांना धनंजय सिंह खिंवसार हा एक मुलगा आहे, जो सध्या जोधपूर क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. धनंजय व्यतिरिक्त त्यांना एक मुलगी देखील आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले आहे आरोग्यविषयक खालील बातमी वाचा सायलेंट हार्ट अटॅकचे 5 संकेत, असा करा बचाव… हार्ट अटॅकच्या बाबतीत जवळपास 45 टक्के केसेस या सायलेंट हार्ट अटॅकच्या असतात. एशियन हार्ट इंस्टीट्यूट, मुंबईचे मेडिकल अफेयर्स आणि क्रिटिकल केयरचे डायरेक्टर डॉ. विजय डी. सिल्वा सांगतात की, हार्ट डिसिज नसतील तरीही सायलेंट हार्ट अटॅक होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या होण्याचे केसेस जास्त असतात. का होतो सायलेंट हार्ट अटॅक?सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रेक्शन silent myocardial infarction (SMI) असे म्हटले जाते. या स्थितीमध्ये व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यावर वेदना होत नाही आणि हार्ट अटॅक आला हेसुध्दा कळत नाही. यामध्ये वेगळे संकेत दिसून येतात. वाचा पूर्ण बातमी