टंचाईची चिंता दूर:जायकवाडी 97 टक्क्यांवर; 5 जिल्ह्यांत 550 गावांचा पाणीप्रश्न 2 वर्षे मिटला; धरणातून यंदा प्रथमच विसर्ग होणार, 18 हजार क्युसेकने आवक
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसहजायकवाडी धरणाच्या वरील भागात जोरदारपाऊस सुरू आहे. यामुळे जायकवाडी धरणातरविवारी सायंकाळी ६ वाजता १८,०७२ क्युसेकवेगाने आवक सुरू होती. सध्या धरणाचासाठा ९७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळेमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाचजिल्ह्यांमधील ५५० गावे आणि ५० लाखलोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोनवर्षांसाठी सुटला आहे. जायकवाडीतून २४तासांत विसर्ग होण्याची शक्यता आहे. धरणाचा साठा वाढत असल्याने खबरदारी म्हणून कोणत्याही क्षणी धरणाच्या मुख्यगेटमधून, गोदावरी नदीच्या पात्रात पाणीसोडले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय सोमवारी ९ रोजी सकाळी घेतला जाईल, असे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता गणेश खराकडर यांनी सांगितले. धरणातून विसर्गाची शक्यता लक्षात घेऊन, गोदावरी काठावरील गावे आणि शहरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्यापात्रालगत कोणीही जाऊ नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. पैठणसह जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या नागरिकांनीशेतामध्ये असणारा शेतीमाल, शेती अवजारे तसेच पाळीव प्राणी, गुरांना सुरक्षित स्थळीहलवावे, मालाची अथवा जीवितहानी होणारनाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाप्रशासनाने दिल्या आहेत. रविवारी सुटीचीपर्वणी साधून धरणावर दिवसभरात दोनहजारांवर पर्यटकांनी भेट दिली. दिव्य मराठी एक्सप्लेनर – विजय काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी Q विसर्गाचा फायदा काय?
A मराठवाडा ५ जिल्ह्यांसह विदर्भ,तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना याच लाभहोईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्णक्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणीसोडले जाईल. तसेच भूजलपातळीवाढीला यामुळे चालना मिळेल.
Q धरणातून आजवर किती वेळाविसर्ग झाला?
A १९७३ मध्ये निर्मिती पूर्ण झाल्यानंतरधरणातून आजवर २२ वेळा विसर्ग झालाआहे. यंदाही साठा पूर्ण झाल्यामुळे विसर्गहोणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माणहोणाऱ्या टंचाईवर मात करता येईल.
Q शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचाउपयोग कसा होणार?
A जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्यानेरब्बीसाठी ७ आवर्तने देण्याचा मार्गमोकळा झाला आहे. त्यामुळेमराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्रवाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातगरजेच्या वेळी पाणी मिळेल. तसेच त्यावेळची गरज ओळखून आवर्तन देण्याचानिर्णय घेतला जाईल. पुढे काय? : १५ सप्टेंबरपर्यंत ९९.१४ टक्के साठा राखणार
धरणाच्या प्रचलन आराखड्यानुसार १ ते १५सप्टेंबर या काळात जायकवाडीत ९९.१४टक्के साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा अधिकसाठा झाल्यास धरणातून विसर्ग केला जातो.आता तशीच परिस्थिती असल्याने विसर्गकरण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
२ वर्षांनंतर होणार विसर्ग
मागील वर्षी याच दिवसातधरणाचा साठा ३२.४२ टक्के होता.दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये १००टक्के भरल्याने, २८ जुलै २०२२रोजी धरणाचे १८ दरवाजे उघडूनपाणी सोडले गेले होते, तर यंदाजायकवाडी धरण ८ आॅगस्टला ९७टक्के भरले आहे. यामुळे सोमवारीपाणी सोडण्याबाबत निर्णय घेतलाजाणार आहे, अशी माहितीधरणाच्या अभियंत्यांनी दिली.
या धरणांतून आवक (क्युसेकमध्ये)
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसहजायकवाडी धरणाच्या वरील भागात जोरदारपाऊस सुरू आहे. यामुळे जायकवाडी धरणातरविवारी सायंकाळी ६ वाजता १८,०७२ क्युसेकवेगाने आवक सुरू होती. सध्या धरणाचासाठा ९७ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळेमराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, परभणी आणि नांदेड या पाचजिल्ह्यांमधील ५५० गावे आणि ५० लाखलोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न दोनवर्षांसाठी सुटला आहे. जायकवाडीतून २४तासांत विसर्ग होण्याची शक्यता आहे. धरणाचा साठा वाढत असल्याने खबरदारी म्हणून कोणत्याही क्षणी धरणाच्या मुख्यगेटमधून, गोदावरी नदीच्या पात्रात पाणीसोडले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय सोमवारी ९ रोजी सकाळी घेतला जाईल, असे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, अभियंता गणेश खराकडर यांनी सांगितले. धरणातून विसर्गाची शक्यता लक्षात घेऊन, गोदावरी काठावरील गावे आणि शहरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्यापात्रालगत कोणीही जाऊ नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. पैठणसह जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या नागरिकांनीशेतामध्ये असणारा शेतीमाल, शेती अवजारे तसेच पाळीव प्राणी, गुरांना सुरक्षित स्थळीहलवावे, मालाची अथवा जीवितहानी होणारनाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाप्रशासनाने दिल्या आहेत. रविवारी सुटीचीपर्वणी साधून धरणावर दिवसभरात दोनहजारांवर पर्यटकांनी भेट दिली. दिव्य मराठी एक्सप्लेनर – विजय काकडे, शाखा अभियंता, जायकवाडी Q विसर्गाचा फायदा काय?
A मराठवाडा ५ जिल्ह्यांसह विदर्भ,तेलंगणातील अनेक जिल्ह्यांना याच लाभहोईल. नांदेडचा बाभळी बंधारा पूर्णक्षमतेने भरेल. त्यामुळे तेलंगणातही पाणीसोडले जाईल. तसेच भूजलपातळीवाढीला यामुळे चालना मिळेल.
Q धरणातून आजवर किती वेळाविसर्ग झाला?
A १९७३ मध्ये निर्मिती पूर्ण झाल्यानंतरधरणातून आजवर २२ वेळा विसर्ग झालाआहे. यंदाही साठा पूर्ण झाल्यामुळे विसर्गहोणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माणहोणाऱ्या टंचाईवर मात करता येईल.
Q शेतीसाठी वाढीव जलसाठ्याचाउपयोग कसा होणार?
A जायकवाडी धरण यंदा पूर्ण भरल्यानेरब्बीसाठी ७ आवर्तने देण्याचा मार्गमोकळा झाला आहे. त्यामुळेमराठवाड्यात बागायती शेतीचे क्षेत्रवाढेल. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातगरजेच्या वेळी पाणी मिळेल. तसेच त्यावेळची गरज ओळखून आवर्तन देण्याचानिर्णय घेतला जाईल. पुढे काय? : १५ सप्टेंबरपर्यंत ९९.१४ टक्के साठा राखणार
धरणाच्या प्रचलन आराखड्यानुसार १ ते १५सप्टेंबर या काळात जायकवाडीत ९९.१४टक्के साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा अधिकसाठा झाल्यास धरणातून विसर्ग केला जातो.आता तशीच परिस्थिती असल्याने विसर्गकरण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
२ वर्षांनंतर होणार विसर्ग
मागील वर्षी याच दिवसातधरणाचा साठा ३२.४२ टक्के होता.दोन वर्षांपूर्वी धरण जुलैमध्ये १००टक्के भरल्याने, २८ जुलै २०२२रोजी धरणाचे १८ दरवाजे उघडूनपाणी सोडले गेले होते, तर यंदाजायकवाडी धरण ८ आॅगस्टला ९७टक्के भरले आहे. यामुळे सोमवारीपाणी सोडण्याबाबत निर्णय घेतलाजाणार आहे, अशी माहितीधरणाच्या अभियंत्यांनी दिली.
या धरणांतून आवक (क्युसेकमध्ये)