विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक डॉ. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्ह्यातील 65 शिक्षकांचा कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मान

विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक डॉ. पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्ह्यातील 65 शिक्षकांचा कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मान

मानवाच्या होत असलेल्या जलद विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे मत माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे (प्राथमिक विभाग) केजी टू पीजीपर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात कृतीशील शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक ६५ शिक्षकांना कृतीशील शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीजीईचे ॲड. मोतिसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, डॉ. अपर्णा पाटील, डॉ. नरेश बजाज, संजय चौधरी, संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, नवकल्पना आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये पूर्वीपेक्षा अधिक आहेत. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये वाढवण्याची, त्यांना सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात, असेही डॉ. पाटील म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल पिलात्रे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, वंदना बोर्डे, पूजिता खेतकर, गजानन शेवलकर आदींनी घेतले. यांचा केला सन्मान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळा ता. मूर्तिजापूर व शहरी भागातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल( डाबकी रोड ) या दोन शाळांचा “कृतीशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे सल्लागार मुरलीधर कुलट यांना सेवानिवृत्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या कविता ढाकणे, देविदास पवार, शशिकांत गायकवाड, दिगंबर खडसे, रवीकुमार खेतकर, हिंमत ढाळे, मोहसीन खान या सहा शिक्षकांना “शिक्षक रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​मानवाच्या होत असलेल्या जलद विकासात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे मत माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे (प्राथमिक विभाग) केजी टू पीजीपर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालयात कृतीशील शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक ६५ शिक्षकांना कृतीशील शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी बीजीईचे ॲड. मोतिसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, डॉ. अपर्णा पाटील, डॉ. नरेश बजाज, संजय चौधरी, संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, नवकल्पना आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये पूर्वीपेक्षा अधिक आहेत. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये वाढवण्याची, त्यांना सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात, असेही डॉ. पाटील म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल पिलात्रे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, वंदना बोर्डे, पूजिता खेतकर, गजानन शेवलकर आदींनी घेतले. यांचा केला सन्मान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळा ता. मूर्तिजापूर व शहरी भागातील खंडेलवाल इंग्लिश स्कूल( डाबकी रोड ) या दोन शाळांचा “कृतीशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे सल्लागार मुरलीधर कुलट यांना सेवानिवृत्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या कविता ढाकणे, देविदास पवार, शशिकांत गायकवाड, दिगंबर खडसे, रवीकुमार खेतकर, हिंमत ढाळे, मोहसीन खान या सहा शिक्षकांना “शिक्षक रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment