केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरच्या दौऱ्यावर:नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कॅन्सरच्या स्वस्ती निवासचे केले उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरच्या दौऱ्यावर:नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ कॅन्सरच्या स्वस्ती निवासचे केले उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कॅन्सर इंस्टीट्यूटच्या स्वस्ती निवासचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या पूर्वी देखील त्यांना इंस्टीट्यूटच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतु तेव्हा मणिपूरचा विषय सुरू असल्याने येता आले नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. परंतु पुन्हा जेव्हा मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण आले तर मी तातडीने इथे येण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले. अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मी शब्द दिला होता की मी पुढील कार्यक्रमाला येईल. या कार्यक्रमाचे निमंत्रण येताच मी आलो. मी बरेच इंस्टीट्यूट पाहिले आहेत आणि मी अनेक इंस्टीट्यूटचा सदस्य देखील राहिलो आहे. पण मी हे आवर्जून सांगेल की नागपूरचे हे कॅन्सर इंस्टीट्यूट भविष्यात मोठे नाव करणार. कारण ज्या इंस्टीट्यूटच्या पाठीशी जे कर्मठ लोक असतात आणि जे संचालक असतात तसेच समाजात कोणी दुखी राहू नये अशी इच्छा असते असेच इंस्टीट्यूट चालतात. मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक आज देवेंद्रजी आणि शैलेशजी दोघेही येथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत बोलणे जरा कठीण आहे. कारण या दोघांच्या आयुष्यात कुटुंबात कॅन्सरने मोठे दुःख आणले होते. परंतु दुःख आणि वेदनेला समाजसेवेच्या संकल्पात परिवर्तीत करून लाखों लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचा विचार खूप कमी लोकांमध्ये येतो. आणि हा विचार या दोघांनी केला आहे. या शुभ संकल्पाला देवाचा आशीर्वाद मिळतो तसेच समाजाचा देखील आशीर्वाद मिळतो. आज पेरलेले बी एवढ्या मोठ्या वटवृक्षात आपल्या समोर उभे राहिले आहे. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, पाश्चिमात्य देशांमध्ये हॉस्पिटलची संकल्पना वेगळी आहे आणि आपल्याकडे वेगळी आहे. आपल्याकडे समाजाची रचना वेगळी आहे. आपली संस्कृती वेगळी आहे. तिकडे कोणी रुग्णालयात दाखल होते तेव्हा कुटुंबातील कोणत्या सदस्याला येऊ दिले जात नाही. आपल्याकडे संपूर्ण कुटुंब रुग्णासोबत रुग्णालयात येते. रुग्णालयात आपण रुग्णाचे कुटुंब येऊन बसलेले बघतो. एक भावना दोघांमध्ये निर्माण झालेली असते. परंतु रुग्णालयाचे देखील काही मर्यादा असतात, रुग्णासाठीच आमच्याकडे बेड नाहीत तुम्हाला कुठून देणार अशी परिस्थिती असते. परंतु या स्वास्थी निवासची कल्पना करून आपल्या भारताच्या हॉस्पिटल बनवण्याच्या क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. अमित शहा म्हणाले, इथे कोणीही पेशंट आला तरी आपल्या कुटुंबाला सोबत ठेऊ शकतो. तसेच येथे भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे तसेच अगदी स्वस्त दरात. त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो. मी माझ्या आयुष्यात आबाजी थत्ते यांच्यासोबत सोबत तीन दिवस प्रवास केला आहे. आबाजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी खूप काम केले आहे. त्यांनी एवढा त्याग केला आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार कधीच दिसून आला नाही. आज त्यांच्या नावाने त्यांची सेवा संस्थानद्वारे हे कॅन्सर इंस्टीट्यूट सुरू केले आहे. भारतात सर्वाधिक ओरल कॅन्सरचे रुग्ण आढळून येणारा देश भारतात सर्वाधिक ओरल कॅन्सरचे रुग्ण आढळून येणारा देश आहे. सर्वायकल कॅन्सरमुळे दर आठ मिनिटाला एक मृत्यू होतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर एक भयानक आजार मानला जात होता. परंतु गेल्या काही वर्षात कॅन्सरवर अनेक उपचार पद्धती निर्माण झाल्या आहेत. मी आज जेवढे रुग्ण येथे बघितले, त्यात सर्वाधिक गरीब आणि मध्यमवर्गातली लोक दिसून आली. केमोथेरपी सारख्या उपचार पद्धती येथे मिळतील. 28 फेब्रुवारी 2015 रोजी याच्या निर्माणचे शिलण्यास झाले आणि 23 मे रोजी मोहनजी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि आज स्वस्ती निवास बनवून याला परिपूर्ण करण्याचे काम झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील 60 कोटी गरिबांसाठी 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला दहा वर्षांपूर्वी असा काळ होता की या भयंकर आजारतून मी वाचू शकेल की नाही अशी परिस्थिती होती. जरी यावर उपचार घेतले तर महाग उपचार मिळत होते. नरेंद्र मोदी यांनी देशातील 60 कोटी गरिबांसाठी 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला आहे. महाराष्ट्रात देखील डबल इंजिन सरकारने विशेष सहायता देण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास 25 लाखांपर्यंत गरीबाला खर्च करण्याची गरज नाही. मोदीजी यांनी केवळ 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारच नव्हे तर स्वस्त मेडिकलचे उपाययोजना केली. 2014 मध्ये देशभरात केवळ 7 एम्स होते आता 23 एम्सला मान्यता देण्यात आली आहे. कॉंग्रेसवर टीका कॉंग्रेसचे लोक जेव्हा फिरत असतात तेव्हा काहीही बोलत असतात. मी काही बोललो तर त्यानंया वाईट वाटते. मी आज पुन्हा सांगू इच्छितो की 2013-14 मध्ये सरदार मनमोहन सिंह यांचे सरकार असताना आरोग्य विभागाचे बजेट 37 हजार कोटी होते. आता 2025-26 मध्ये मोदीजींनी 1 लाख 35 हजार कोटींचा केवळ आरोग्यचे बजेट केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment