वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या:महिला आयोगाने कारवाईस पुढाकार न घेणे हे लज्जास्पद, कसपटे कुटुंबाच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या:महिला आयोगाने कारवाईस पुढाकार न घेणे हे लज्जास्पद, कसपटे कुटुंबाच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंडा पद्धती सुरू असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे. या घटनेनंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांची कॉंग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी भेट घेतली आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे तसेच सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे विजय वडेट्टीवार म्हणाले, पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या स्व. वैष्णवी हगवने हिचे आई- वडील आणि कसपटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत. वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की, ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलिस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दुःखद आहे. महिला आयोगावर टीका पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या 9 महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणी आहे. ..तर वैष्णवी हगवणेची आत्महत्या टळली असती- ज्योती मेटे दरम्यान, शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी देखील राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मयूरी हगवणे यांनी महिला आयोगाकडे केलेली तक्रार आणि त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच सांगितले की त्यांची तक्रार आम्ही एका पोलिस स्टेशनला पाठवली होती. परंतु नंतर काय? आयोग एक संविधानिक पद आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या तक्रारींचा जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत मग त्या आयोगाच्या असण्याला काही महत्त्वच उरत नाही. त्यामुळे मयूरी हगवणेच्या तक्रारीवर महिला आयोगाने त्वरित आणि योग्य ती कारवाई झाली असती तर निश्चितच वैष्णवी हगवणेचा मृत्यू किंवा आत्महत्या टळली असती.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment