वैष्णवीच्या मामे सासऱ्यांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप:पोलिस महानिरीक्षक सुपेकरांचा दबाव, अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे यांचा त्यांच्या सासरी हुंड्यासाठी छळ झाला होता. या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार असल्याचे समजते. त्यांना शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आयजी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. आयजी जालिंदर सुपेकरांवर 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी (पोलिस महानिरीक्षक) आहेत. त्यांची माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाहीतर जळगावमध्ये पीएसआय सादरे जे होते त्यांना, या आयजीनेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. हगवणे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचे अंजली दमानिया म्हणाल्या, जालिंदर सुपेकर हे पोलिस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे, तिने पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा, वैष्णवीच्या नणंदेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. म्हणजेच, फरार व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मयुरीच्या आई आणि भावा विरुद्ध एफआयआर करते, आणि पुन्हा गायब होते. तसेच, तू आमचे काहीही बिघडवू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. मला असे वाटते की, हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचे आहे, यामध्ये सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, वैष्णवीचे सगळ्यात जास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिष्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सुनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळले जायचे. ह्या कुटुंबाला खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी एक फोटीही ट्विट केला आहे. वैष्णवीच्य अंगावरील जखमांपैकी तीन छिद्र असलेली जखम संशयास्पद वाटते. वैष्णवीच्या वडिलांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.