वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांचे गोडसेंची नाते आहे. लग्नानंतर त्यांचे सासरचे आडनावच गोडसे असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. तर याला आता वर्षा गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. शेलार हे अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा पलटवार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर वर्षा गायकवाड यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तार दिले आहे. नथुराम गोडसे यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही. वैचारिक नाते देखील दूर-दूरपर्यंत नाही. आमचे वैचारिक नाते हे महात्मा गांधी यांच्याशी आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. आशिषजींनी आपल्या अकलेचे तारे तोडावेत म्हणजे नवलच आशिष शेलार हे त्यांची बौद्धिक दिवाळखोरी ही त्यांच्या अतार्किक बोलण्यातून वेळोवेळी सिद्ध करत असतात. जननायक राहुल गांधीजी यांच्या न्यायालयीन लढ्यात त्यांनी आपल्या शपथ पत्रात सावरकर व नथुराम गोडसे यांचं नातं असल्याचं नमूद केलं आहे. यावरती आशिषजींनी आपल्या अकलेचे तारे तोडावेत म्हणजे नवलच… माझ्या सासरकडचं आडनाव गोडसे असल्यानं आशिष शेलारजींनी त्याचा संबंध थेट नथुराम गोडसेशी जोडला. म्हणजे देवानं लवचिक जीभ दिली आहे, म्हणून ती कशीही वळवायची का? आशिष जी तोंडाला टाळं बसवा.. माझं व माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसे याच्याशी नातं तर नक्कीच नाही.. पण, वैचारिक नातं देखील दूर-दूरपर्यंत नाही. आमचे आचार आणि विचारांचं नातं हे महात्मा गांधी यांच्याशी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. एक गोष्ट निक्षुन सांगावीशी वाटते की, बहुसंख्य गोडसे आडनाव असलेल्यांचं नातं हे गांधींजींशीच जोडलेलं आहे. याउलट आशिष शेलार यांचं वैचारिक नातं मात्र नथुराम गोडसे याच्याशीच जोडलं गेलेलं आहे. संघाचे स्वयंसेवक या नात्यानं दोघांचं नातं हे गुरुबंधूचं लागतं. आणि हो.. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं तर, आशिष जींचं आडनाव शेलार आहे खरं.. मात्र, आडनाव शेलार असलं तरी शेलार मामांचं शौर्य यांना कधीच प्राप्त होऊ शकणार नाही, हे वास्तव आहे. असो.. मुंबईचे हाल करून सोडलेत तुमच्या सरकारनं.. तुम्ही पालक मंत्री आहात.. त्या पदाला जरा जागा.. जबाबदारीनं वागा आणि वायफळ बडबड करणं बंद करा..!

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment