Category: marathi

युतीत शिंदे- अजित पवारांना केवळ 40 ते 50 जागा:लोकसभेतही मोदी-शहांमुळेच त्यांना स्ट्राईकरेट; खासदार संजय राऊत यांचा निशाणा

युतीत शिंदे- अजित पवारांना केवळ 40 ते 50 जागा:लोकसभेतही मोदी-शहांमुळेच त्यांना स्ट्राईकरेट; खासदार संजय राऊत यांचा निशाणा

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष आहे आणि इतर दोन पक्ष हे आश्रीत पक्ष आहेत. अशा आश्रीत पक्षांना जास्त आवाज नसतो. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षातील गुजराती व्यापार मंडळ या आश्रीत पक्षांसमोर जे तुकडे फेकतील, ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला युतीत केवळ 40 ते 50 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षासोबत स्वाभिमानासाठी लढली ती केवळ शिवसेना, प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. एवढी हिंमत दुसऱ्या कोणामध्येच नाही. ती हिंमत केवळ शिवसेनेमध्ये होती, असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी स्वाभिमान, अभिमान हे सर्व शब्द संपलेले असल्याचे देखील ते म्हणाले. मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपद हातात दिले. त्यामुळे जे दिले ते घ्या आणि गप्प बसा, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्राइक रेट बाबत वक्तव्य केले होते. शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त असून जागा वाटपात जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट हा केवळ मोदी आणि शहा यांच्यामुळेच असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि शहा यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर अडीच वर्षांपूर्वी दबाव आणला नसता तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले नसते. त्याच्यामुळे मिळालेला स्ट्राइक रेट दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच चिन्ह घ्यावे आणि त्यानंतर निवडणूक लढवावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले. त्यांनंतर त्यांनी स्ट्राइक रेट दाखवला तर आम्ही तो मान्य करु असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

​महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष आहे आणि इतर दोन पक्ष हे आश्रीत पक्ष आहेत. अशा आश्रीत पक्षांना जास्त आवाज नसतो. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षातील गुजराती व्यापार मंडळ या आश्रीत पक्षांसमोर जे तुकडे फेकतील, ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला युतीत केवळ 40 ते 50 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षासोबत स्वाभिमानासाठी लढली ती केवळ शिवसेना, प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. एवढी हिंमत दुसऱ्या कोणामध्येच नाही. ती हिंमत केवळ शिवसेनेमध्ये होती, असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी स्वाभिमान, अभिमान हे सर्व शब्द संपलेले असल्याचे देखील ते म्हणाले. मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपद हातात दिले. त्यामुळे जे दिले ते घ्या आणि गप्प बसा, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्राइक रेट बाबत वक्तव्य केले होते. शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त असून जागा वाटपात जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट हा केवळ मोदी आणि शहा यांच्यामुळेच असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि शहा यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर अडीच वर्षांपूर्वी दबाव आणला नसता तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले नसते. त्याच्यामुळे मिळालेला स्ट्राइक रेट दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच चिन्ह घ्यावे आणि त्यानंतर निवडणूक लढवावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले. त्यांनंतर त्यांनी स्ट्राइक रेट दाखवला तर आम्ही तो मान्य करु असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.  

मुक्तीसंग्राम दिनी बलात्कारी बापाच्या जोखडातून मुलीची खंडपीठाकडून मुक्तता:27 आठवड्यांचा गर्भ काढण्याचे न्यायालयाचे आदेश

मुक्तीसंग्राम दिनी बलात्कारी बापाच्या जोखडातून मुलीची खंडपीठाकडून मुक्तता:27 आठवड्यांचा गर्भ काढण्याचे न्यायालयाचे आदेश

सिकलसेल ॲनिमिया हा दुर्धर आजार असलेल्या पोटच्या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची सार्वजनिक सुटी असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घटना गांभीर्याने घेत सुनावणी ठेवली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत वैद्यकीय अहवाला आधारे पीडित मुलीच्या पोटातील गर्भ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुट्टीचा दिवस असतानाही मानवतावादी दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता खंडपीठाने आदेश पारित करीत शासनाच्या सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या वडिलांनीच बलात्कार केला होता. अल्पवयीन मुलगी ही सिकलसेल ॲनिमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. वडिलांच्या अत्याचारातून मुलीला गर्भधारणा झाली. कुटुंब गरीब परिस्थितीतील असल्याने संबंधित बाब बाहेर पडल्यास आपली बदनामी होईल, या भीतीने काही दिवस हा प्रकार लपवून ठेवण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर प्रकरणात गुन्हा दाखल झाला. संबंधित प्रकरण खंडपीठात आल्यानंतर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागविण्यात आला. खंडपीठात या प्रकरणावर 13 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी झाली. खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय. जी खोब्रागडे यांनी प्रकरण सविस्तरपणे ऐकले आणि प्रकरण ऐकल्यानंतर नंदुरबार शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागितला रुग्णालयाने 14 सप्टेंबर 2024 रोजी सविस्तर अहवाल सादर केला. अहवालात नमूद केले होते की, मुलगी आणि होणाऱ्या बाळाला दोघांनाही धोका आहे. बाळ ठेवले आणि ते जन्मल्यानंतर मुलीस असलेला सिकलसेल ॲनिमियाचा आजार त्याला बळावू शकतो. त्यामुळे धोका असला तरी गर्भपात करणे हाच त्यावर एकमेव उपाय असू शकतो, असे अहवालात स्पष्ट नमूद केले होते. जन्मल्यानंतर बाळाला इजा होऊ शकते या अहवालावर खंडपीठाने संबंधित गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले. पीसी पीएनडीटी लेव्हल सेंटर हे नंदुरबार येथे नसून छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात आहे. त्यामुळे खंडपीठाने 17 सप्टेंबर रोजी तात्काळ मुलीचा गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच पुण्यातील तपासणीक अधिकाऱ्याला पुरावे जमा करण्याचे आदेश दिले. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नेहा कांबळे यांनी बाजू मांडली तर पीडित मुलीच्या वतीने ॲड. शिल्पा अवचार शेरखाने यांनी युक्तिवाद केला.

​सिकलसेल ॲनिमिया हा दुर्धर आजार असलेल्या पोटच्या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची सार्वजनिक सुटी असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घटना गांभीर्याने घेत सुनावणी ठेवली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत वैद्यकीय अहवाला आधारे पीडित मुलीच्या पोटातील गर्भ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुट्टीचा दिवस असतानाही मानवतावादी दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता खंडपीठाने आदेश पारित करीत शासनाच्या सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या वडिलांनीच बलात्कार केला होता. अल्पवयीन मुलगी ही सिकलसेल ॲनिमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. वडिलांच्या अत्याचारातून मुलीला गर्भधारणा झाली. कुटुंब गरीब परिस्थितीतील असल्याने संबंधित बाब बाहेर पडल्यास आपली बदनामी होईल, या भीतीने काही दिवस हा प्रकार लपवून ठेवण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर प्रकरणात गुन्हा दाखल झाला. संबंधित प्रकरण खंडपीठात आल्यानंतर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागविण्यात आला. खंडपीठात या प्रकरणावर 13 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी झाली. खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय. जी खोब्रागडे यांनी प्रकरण सविस्तरपणे ऐकले आणि प्रकरण ऐकल्यानंतर नंदुरबार शासकीय रुग्णालयाचा अहवाल मागितला रुग्णालयाने 14 सप्टेंबर 2024 रोजी सविस्तर अहवाल सादर केला. अहवालात नमूद केले होते की, मुलगी आणि होणाऱ्या बाळाला दोघांनाही धोका आहे. बाळ ठेवले आणि ते जन्मल्यानंतर मुलीस असलेला सिकलसेल ॲनिमियाचा आजार त्याला बळावू शकतो. त्यामुळे धोका असला तरी गर्भपात करणे हाच त्यावर एकमेव उपाय असू शकतो, असे अहवालात स्पष्ट नमूद केले होते. जन्मल्यानंतर बाळाला इजा होऊ शकते या अहवालावर खंडपीठाने संबंधित गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले. पीसी पीएनडीटी लेव्हल सेंटर हे नंदुरबार येथे नसून छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात आहे. त्यामुळे खंडपीठाने 17 सप्टेंबर रोजी तात्काळ मुलीचा गर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच पुण्यातील तपासणीक अधिकाऱ्याला पुरावे जमा करण्याचे आदेश दिले. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नेहा कांबळे यांनी बाजू मांडली तर पीडित मुलीच्या वतीने ॲड. शिल्पा अवचार शेरखाने यांनी युक्तिवाद केला.  

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधीच संपवले:सीएम एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर डोळ्यावर पट्टी बांधली- लक्ष्मण हाके

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधीच संपवले:सीएम एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर डोळ्यावर पट्टी बांधली- लक्ष्मण हाके

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधीच संपवून टाकले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात नेल्याने निवडणुका होत नाही, असे ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 18 पगड जातीने एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवावे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप केला आहे. सर्वाधिक आमदार तुमचे मग तुम्ही मागास कसे लक्ष्मण हाके म्हणाले की, मराठा समाज मागास आहे, हे मनोज जरांगे वारंवार सांगतात, तर कोणता समाज पुढारला हे त्यांनी सिद्ध करावे. कारखाने, जिल्हा बँका तुमच्याच ताब्यात आहेत. आमदार आणि खासदार सर्वाधिक तुमचेच असताना, तुम्ही मागास कसे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ही अस्तित्त्वाची लढाई लक्ष्मण हाके म्हणाले की, हक्कासाठी आता संघर्ष केला नाही, तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. आपपासात भांडण न करता संघर्षासाठी एकजूट दाखवा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्का माणूस निवडून पाठवू द्या, ओबीसी आरक्षण जनजागृती सभेत, ही अस्तित्त्वाची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओबीसींची संख्या कशी कमी झाली लक्ष्मण हाके म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाबाबत डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. 1931 मध्ये इंग्रजांनी जातीनिहाय गणना केली होती. त्यावेळी राज्यात 40 टक्के ओबीसी लोक होते. आता ही संख्या कशी कमी झाली, त्यासाठी कोणता आधार लावला हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

​स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कधीच संपवून टाकले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात नेल्याने निवडणुका होत नाही, असे ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 18 पगड जातीने एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवावे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप केला आहे. सर्वाधिक आमदार तुमचे मग तुम्ही मागास कसे लक्ष्मण हाके म्हणाले की, मराठा समाज मागास आहे, हे मनोज जरांगे वारंवार सांगतात, तर कोणता समाज पुढारला हे त्यांनी सिद्ध करावे. कारखाने, जिल्हा बँका तुमच्याच ताब्यात आहेत. आमदार आणि खासदार सर्वाधिक तुमचेच असताना, तुम्ही मागास कसे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ही अस्तित्त्वाची लढाई लक्ष्मण हाके म्हणाले की, हक्कासाठी आता संघर्ष केला नाही, तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. आपपासात भांडण न करता संघर्षासाठी एकजूट दाखवा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्का माणूस निवडून पाठवू द्या, ओबीसी आरक्षण जनजागृती सभेत, ही अस्तित्त्वाची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओबीसींची संख्या कशी कमी झाली लक्ष्मण हाके म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाबाबत डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. 1931 मध्ये इंग्रजांनी जातीनिहाय गणना केली होती. त्यावेळी राज्यात 40 टक्के ओबीसी लोक होते. आता ही संख्या कशी कमी झाली, त्यासाठी कोणता आधार लावला हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

मराठवाड्यात 45 हजार कोटींपैकी 29 हजार कोटींची कामे मार्गी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण

मराठवाड्यात 45 हजार कोटींपैकी 29 हजार कोटींची कामे मार्गी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून मराठवाड्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 45 हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा मराठवाड्यासाठी करण्यात आली होती. यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे आता मार्गी लागत असून उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे आणि त्यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू देणार नाही. सरकार मराठवाड्यातील जनतेच्या पाठीमागे कायम राहील, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नागपूर मुंबई – समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले. किर्लोस्कर आणि टेस्टला सारख्या मोठ्या कंपन्या मराठवाड्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यामध्ये अनेक कंपन्या येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांना रोजगार देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. उद्योगाला चालला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा? भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. पूर्ण बातमी वाचा…

​मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून मराठवाड्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी 45 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 45 हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा मराठवाड्यासाठी करण्यात आली होती. यातील 29 हजार कोटी रुपयांची कामे आता मार्गी लागत असून उर्वरित कामे देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे आणि त्यासाठी लागणारा निधी कधीही कमी पडू देणार नाही. सरकार मराठवाड्यातील जनतेच्या पाठीमागे कायम राहील, असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नागपूर मुंबई – समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील ते म्हणाले. किर्लोस्कर आणि टेस्टला सारख्या मोठ्या कंपन्या मराठवाड्यामध्ये येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना रोजगार देखील मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यामध्ये अनेक कंपन्या येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांना रोजगार देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. उद्योगाला चालला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… हैदराबाद संस्थान मुक्त करणारे ‘ऑपरेशन पोलो’:निजामी सत्तेला पाच दिवसात पत्करावी लागली शरणागती; कसा राहिला अखेरचा लढा? भारत स्वातंत्र्यानंतर देखील हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरूच होता. मात्र त्यासाठी सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ राबवावे लागले. काय होते हे ‘ऑपरेशन पोलो’? निजामी सत्तेला पाच दिवसात कशी पत्करावी लागली शरणागती? कसा राहिला अखेरचा लढा? आजच्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने पाहुयात, या लढ्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी…. पूर्ण बातमी वाचा…  

जरांगे पाटील यांनी सरकारला सहकार्य करावे:कोणाचीही दिशाभूल करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

जरांगे पाटील यांनी सरकारला सहकार्य करावे:कोणाचीही दिशाभूल करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

मराठा समाजाची आरक्षणाबाबत सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहकाऱ्यांची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कोणाचीही दिशाभूल करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे आरक्षण मराठा समाजाला देणार असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आरक्षणाबाबत कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे, ते सर्व देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत कोणाचीही फसवणूक करणार नाही. दिलेला शब्द पाळणारे हे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे माझे आवाहन आणि विनंती आहे, सरकारने सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकाऱ्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांना आतापर्यंत संधी होती. मात्र, त्यांनी आतापर्यंत काही दिलेले नाही, त्यांनी काही न देता केवळ मराठा समाजाच्या भावनांशी खेळ केला. त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. इतरही कोणत्याच समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी : मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईकरेटच्या मुद्यावरुन सावध पवित्रा, उद्या महत्त्वावी बैठक लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झाला असून जागा वाटपा सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जागावाटप बरोबरच महामंडळ वाटपात बाबत देखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूर्ण बातमी वाचा… बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​मराठा समाजाची आरक्षणाबाबत सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहकाऱ्यांची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कोणाचीही दिशाभूल करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करणारे आरक्षण मराठा समाजाला देणार असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आरक्षणाबाबत कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे, ते सर्व देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत कोणाचीही फसवणूक करणार नाही. दिलेला शब्द पाळणारे हे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे माझे आवाहन आणि विनंती आहे, सरकारने सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकाऱ्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांना आतापर्यंत संधी होती. मात्र, त्यांनी आतापर्यंत काही दिलेले नाही, त्यांनी काही न देता केवळ मराठा समाजाच्या भावनांशी खेळ केला. त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. इतरही कोणत्याच समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचा वापर करून घेणाऱ्यांना जाब विचारणार की नाही? असा प्रश्न देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी : मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईकरेटच्या मुद्यावरुन सावध पवित्रा, उद्या महत्त्वावी बैठक लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झाला असून जागा वाटपा सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जागावाटप बरोबरच महामंडळ वाटपात बाबत देखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूर्ण बातमी वाचा… बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी:मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईकरेटच्या मुद्यावरुन सावध पवित्रा, उद्या महत्त्वावी बैठक

अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी:मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईकरेटच्या मुद्यावरुन सावध पवित्रा, उद्या महत्त्वावी बैठक

लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झाला असून जागा वाटपा सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जागावाटप बरोबरच महामंडळ वाटपात बाबत देखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितले की, सत्ताधारी युतीचा फॉर्म्युला ठरला असून सुमारे 70-80 टक्के जागावाटपावर अंतिम झाले आहे. विरोधी महाविकास आघाडीच्या खूप आधी महायुतीचा समझोता होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महायुतीत सामील आहेत. तर जागावाटप आणि त्याची औपचारिक घोषणा याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित केला जाईल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमधील जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच लोकांना महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दिसेल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, जवळपास 70 ते 80 टक्के मतदारसंघातील जागावाटप निश्चित झाले आहे. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), देवेंद्र फडणवीस (भाजप) आणि प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) यांच्यातील नुकत्याच झालेल्या बैठकीत उमेदवार विजयाची शक्यता हा सर्वात महत्त्वाचा निकष होता. दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबंधित उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, युतीच्या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची चांगलीच कल्पना आहे. काही उमेदवार उशिरा जाहीर करण्याची चूक यावेळी पुन्हा होणार नाही. अजित गटाकडून जास्त जागांची मागणी उदय सामंत म्हणाले की, आम्ही 75 टक्क्यांहून अधिक मतदारसंघांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. तथापि, कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, मला तीन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला माहित नाही, परंतु आम्ह निवडणूक लढवण्यासाठी सुमारे 80 जागांची मागणी केली आहे. सध्याच्या विधानसभेत भाजप 103 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना 40, NCP 41, काँग्रेस, ठाकरे गट 15, NCP (शरदचंद्र पवार) 13 आणि इतर 29 आहेत. काही जागा रिक्त आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागावाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झाला असून जागा वाटपा सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जागावाटप बरोबरच महामंडळ वाटपात बाबत देखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सांगितले की, सत्ताधारी युतीचा फॉर्म्युला ठरला असून सुमारे 70-80 टक्के जागावाटपावर अंतिम झाले आहे. विरोधी महाविकास आघाडीच्या खूप आधी महायुतीचा समझोता होईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महायुतीत सामील आहेत. तर जागावाटप आणि त्याची औपचारिक घोषणा याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित केला जाईल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमधील जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच लोकांना महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दिसेल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, जवळपास 70 ते 80 टक्के मतदारसंघातील जागावाटप निश्चित झाले आहे. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), देवेंद्र फडणवीस (भाजप) आणि प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) यांच्यातील नुकत्याच झालेल्या बैठकीत उमेदवार विजयाची शक्यता हा सर्वात महत्त्वाचा निकष होता. दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबंधित उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, युतीच्या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची चांगलीच कल्पना आहे. काही उमेदवार उशिरा जाहीर करण्याची चूक यावेळी पुन्हा होणार नाही. अजित गटाकडून जास्त जागांची मागणी उदय सामंत म्हणाले की, आम्ही 75 टक्क्यांहून अधिक मतदारसंघांसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. तथापि, कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, मला तीन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला माहित नाही, परंतु आम्ह निवडणूक लढवण्यासाठी सुमारे 80 जागांची मागणी केली आहे. सध्याच्या विधानसभेत भाजप 103 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना 40, NCP 41, काँग्रेस, ठाकरे गट 15, NCP (शरदचंद्र पवार) 13 आणि इतर 29 आहेत. काही जागा रिक्त आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

जामनेर येथील तरुणाने अमेरिकेत केला जागरण गोंधळाचा कार्यक्रम, न्यू जर्सीतील कार्यक्रमास पाचशेपेक्षा अधिक भारतीयांची हजेरी‎‎

जामनेर येथील तरुणाने अमेरिकेत केला जागरण गोंधळाचा कार्यक्रम, न्यू जर्सीतील कार्यक्रमास पाचशेपेक्षा अधिक भारतीयांची हजेरी‎‎

तालुक्यातील तरुणाने अमेरिकेत प्रथमच जागरण गोंधळाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमासाठी अमेरिका स्थित पाचशे पेक्षा अधिक भारतीय नागरिकांची उपस्थिती होती. अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील एडिसन शहरात हा कार्यक्रम झाला. सोनाळा येथील मूळ रहिवासी तथा जामनेर न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांचा मोठा मुलगा प्रवीण पाटील हा १२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम अमेरिकेत व्हावा. अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यानुसार प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या पूर्वजांचे वंशज, पुणे येथील प्रसिद्ध गोंधळी हरदास शिंदे यांना सहकलाकारांसह अमेरिकेला नेले. त्या ठिकाणी देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला. यावेळी अमेरिकेत स्थायिक झालेले ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. तीन वर्षांपूर्वी प्रवीण पाटील यांनी अमेरिकेत पहिले विठ्ठल मंदिर बांधून त्या ठिकाणी आषाढी एकादशीला वारीची परंपरा सुरू केली. या वारीसाठीही अनेक भारतीय उपस्थित असतात. अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष संत श्री गोविंदगिरी महाराज स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाला अमेरिकेत गेले होते. त्यावेळी पाटील यांच्याकडे ते तीन दिवस मुक्कामी होते.

​तालुक्यातील तरुणाने अमेरिकेत प्रथमच जागरण गोंधळाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमासाठी अमेरिका स्थित पाचशे पेक्षा अधिक भारतीय नागरिकांची उपस्थिती होती. अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील एडिसन शहरात हा कार्यक्रम झाला. सोनाळा येथील मूळ रहिवासी तथा जामनेर न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांचा मोठा मुलगा प्रवीण पाटील हा १२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम अमेरिकेत व्हावा. अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यानुसार प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या पूर्वजांचे वंशज, पुणे येथील प्रसिद्ध गोंधळी हरदास शिंदे यांना सहकलाकारांसह अमेरिकेला नेले. त्या ठिकाणी देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला. यावेळी अमेरिकेत स्थायिक झालेले ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. तीन वर्षांपूर्वी प्रवीण पाटील यांनी अमेरिकेत पहिले विठ्ठल मंदिर बांधून त्या ठिकाणी आषाढी एकादशीला वारीची परंपरा सुरू केली. या वारीसाठीही अनेक भारतीय उपस्थित असतात. अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष संत श्री गोविंदगिरी महाराज स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाला अमेरिकेत गेले होते. त्यावेळी पाटील यांच्याकडे ते तीन दिवस मुक्कामी होते.  

बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी:महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र सोबतच वादळ आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबर कोकणात देखील आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे गणेश उत्सवाच्या मिरवणुकीतच मुंबई आणि उपनगरामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईचे कमाल तापमान देखील 32°c च्या जवळपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र आज हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील ताशी 30 ते 40 प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आज दुपारनंतर ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दिवसभर ढग विरळ होते. सूर्य तळपत होता. परिणामी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.8 अंशानी वाढ होऊन ते 32.0 आणि किमान तापमान 21.2 अंश सेल्सियस नोंद झाली. गेल्या 24 तासांत शहर परिसरात 3 मिमी पाऊस पडला. दरम्यान, आज अनंत चतुर्दशी आहे. श्रीगणेशाचे विसर्जन उत्साहात होणार आहे. दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. पोषक वातावरण असलेल्या ठिकाणीच पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

​गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र सोबतच वादळ आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबर कोकणात देखील आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे गणेश उत्सवाच्या मिरवणुकीतच मुंबई आणि उपनगरामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईचे कमाल तापमान देखील 32°c च्या जवळपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र आज हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील ताशी 30 ते 40 प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आज दुपारनंतर ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दिवसभर ढग विरळ होते. सूर्य तळपत होता. परिणामी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.8 अंशानी वाढ होऊन ते 32.0 आणि किमान तापमान 21.2 अंश सेल्सियस नोंद झाली. गेल्या 24 तासांत शहर परिसरात 3 मिमी पाऊस पडला. दरम्यान, आज अनंत चतुर्दशी आहे. श्रीगणेशाचे विसर्जन उत्साहात होणार आहे. दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. पोषक वातावरण असलेल्या ठिकाणीच पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.  

दिव्य मराठी अपडेट्स:हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

दिव्य मराठी अपडेट्स:हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मनपाच्या 16 प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण छत्रपती संभाजीनगर – हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त मंगळवारी (17 सप्टेंबर) सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर ते महापालिकेच्या 16 प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील. या कार्यकमासाठी मुख्यमंत्री सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास शहरात आले.
काश्मीरमध्ये प्रचार थांबला, उद्या मतदान श्रीनगर – जम्मू-काश्मिरात निवडणूक प्रचार सोमवारी थंडावला. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला डोडा, किश्तवाड, रामबनच्या 8 जागी मतदान होईल. शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शाह यांच्या 3 प्रचार सभा झाल्या. कृष्ण जन्मभूमी : आज सुप्रीम कोर्टात सुनावणी मथुरा – श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सुनावणी सुरू ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी घेईल. मुस्लिम पक्षाने हायकोर्टाच्या 1 ऑगस्टच्या निर्णयास आव्हान दिले आहे. ओबीसी नेतेही करणार आंतरवालीतच उपोषण जालना – आंतरवाली सराटीत ओबीसी नेतेही उपोषणास बसणार आहेत. ‘मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही. मात्र ते जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जातात. त्यामुळे जेव्हा ते जरांगेंना भेटण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना आम्हालाही भेटणे सोपे व्हावे म्हणून, जरांगे पाटील जिथे उपोषण करतील तिथेच दुसऱ्या दिवशीपासून उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हेसुद्धा उपोषण करणार आहेत. हिंगोलीत नियोजन समिती सभागृहात‎आज दिव्यांगांना साहित्याचे वाटप‎ हिंगोली – जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने‎दिव्यांगांना मंगळवारी 17 रोजी, सकाळी 11 वाजता‎जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात साहित्याचे‎वाटप केले जाणार आहे. या वेळी पालकमंत्री अब्दुल‎सत्तार, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ.‎प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार‎संतोष बांगर, जिल्हाधिकारी आदी उपस्थित राहणार‎आहेत. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन‎अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शंेंगुलवार,‎समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.‎ गणेश विसर्जनानंतर पुन्हा सुरू होणार अदानीविरुद्ध धारावीकरांचे आंदोलन मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेतृत्वात धारावीकरांनी अदानींविरुद्ध आंदोलन केले होते. प्रत्येक झोपडपट्टीधारकाला 350 चौरस फुटांचे घर अशी त्यांची मागणी होती. लोकसभेचा निकाल लागल्यावर आंदोलक शांत झाले. त्यानंतर गेल्या आठवड्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे गाजावाजा न करता भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या धारावीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि उद्धवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जनानंतर आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मनपाच्या 16 प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण छत्रपती संभाजीनगर – हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त मंगळवारी (17 सप्टेंबर) सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर ते महापालिकेच्या 16 प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील. या कार्यकमासाठी मुख्यमंत्री सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास शहरात आले.
काश्मीरमध्ये प्रचार थांबला, उद्या मतदान श्रीनगर – जम्मू-काश्मिरात निवडणूक प्रचार सोमवारी थंडावला. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला डोडा, किश्तवाड, रामबनच्या 8 जागी मतदान होईल. शेवटच्या दिवशी गृहमंत्री अमित शाह यांच्या 3 प्रचार सभा झाल्या. कृष्ण जन्मभूमी : आज सुप्रीम कोर्टात सुनावणी मथुरा – श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सुनावणी सुरू ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी घेईल. मुस्लिम पक्षाने हायकोर्टाच्या 1 ऑगस्टच्या निर्णयास आव्हान दिले आहे. ओबीसी नेतेही करणार आंतरवालीतच उपोषण जालना – आंतरवाली सराटीत ओबीसी नेतेही उपोषणास बसणार आहेत. ‘मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही. मात्र ते जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जातात. त्यामुळे जेव्हा ते जरांगेंना भेटण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना आम्हालाही भेटणे सोपे व्हावे म्हणून, जरांगे पाटील जिथे उपोषण करतील तिथेच दुसऱ्या दिवशीपासून उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हेसुद्धा उपोषण करणार आहेत. हिंगोलीत नियोजन समिती सभागृहात‎आज दिव्यांगांना साहित्याचे वाटप‎ हिंगोली – जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने‎दिव्यांगांना मंगळवारी 17 रोजी, सकाळी 11 वाजता‎जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात साहित्याचे‎वाटप केले जाणार आहे. या वेळी पालकमंत्री अब्दुल‎सत्तार, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ.‎प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार‎संतोष बांगर, जिल्हाधिकारी आदी उपस्थित राहणार‎आहेत. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन‎अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शंेंगुलवार,‎समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे.‎ गणेश विसर्जनानंतर पुन्हा सुरू होणार अदानीविरुद्ध धारावीकरांचे आंदोलन मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेतृत्वात धारावीकरांनी अदानींविरुद्ध आंदोलन केले होते. प्रत्येक झोपडपट्टीधारकाला 350 चौरस फुटांचे घर अशी त्यांची मागणी होती. लोकसभेचा निकाल लागल्यावर आंदोलक शांत झाले. त्यानंतर गेल्या आठवड्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे गाजावाजा न करता भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या धारावीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि उद्धवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जनानंतर आंदोलन करण्याचे ठरवले आहे.  

मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक 11 वाजता निघणार:पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांना थोड्याच वेळात सुरुवात

मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक 11 वाजता निघणार:पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांना थोड्याच वेळात सुरुवात

10 दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. यासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​​​​​​​​गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

​10 दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. यासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभरात प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​​​​​​​​गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.