Category: marathi

विदर्भात भाजपला मोठे खिंडार:माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

विदर्भात भाजपला मोठे खिंडार:माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

विदर्भातील भाजपची ताकद कमी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत असल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, येत्या 13 सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोपालदास अग्रवाल महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांना पालकमंत्री बाबा आत्राम यांनी बोलण्याची संधी दिली नसल्याने त्यांनी तडकाफडकी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक 14 ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्यांवर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अग्रवाल यांनी तातडीने नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती. कोण आहेत गोपालदास अग्रवाल?
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले. आता ते 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

​विदर्भातील भाजपची ताकद कमी करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळत असल्याचे दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, येत्या 13 सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोपालदास अग्रवाल महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांना पालकमंत्री बाबा आत्राम यांनी बोलण्याची संधी दिली नसल्याने त्यांनी तडकाफडकी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक 14 ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्यांवर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर अग्रवाल यांनी तातडीने नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच या प्रकरणाची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती. कोण आहेत गोपालदास अग्रवाल?
गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले. आता ते 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.  

बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे- अजित पवार:बारामतीतून निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत; कोणाला मिळणार उमेदवारी?

बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे- अजित पवार:बारामतीतून निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत; कोणाला मिळणार उमेदवारी?

कसब्यातील राष्ट्रपती भवन येथे काही नेत्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहे. यावेळी पवारांनी आपली खदखद बोलून दाखविली आहे. ते म्हणाले की, आता बारामतीकरांना मी नाही तर कुणीतरी दुसरा आमदारा मिळायला पाहिजे. या विधानानंतर अजित पवार हे बारामतीतून लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या विधानानंतर नेमका दादा आता बारामतीतून कुणाला उमेदवारी देणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे बारामतीतून विधानसभा लढतील, अशीही चर्चा होतेय. मी सोडून आमदार मिळायला पाहिजे- अजितदादा अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता 65 वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादा’ अशा घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जिथे पिकतं तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा. अजितदादा म्हणाले- बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे रस्ता बघा. काही राहिले असेल तर तेही मी मान्य करतो. कसे करायचे ते त्याचाही विचार करू. न मागता मेडिकल कॉलेज मिळालं. या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचं नाव देणार आहोत. तसेच, आयुर्वेदिक कॉलेज तयार करणार आहोत. विकासकामावर काय म्हणाले दादा?
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. काही चुकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. काही वेगळ्या अफवा उठल्या तर लगेच विश्वास ठेवू नका. राज्याची जबाबदारी राष्ट्रवादीने मला दिली. मला राज्यात फिरावेच लागेल. रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी निवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही. गंमतीचा भाग जाऊ द्या. अनेकदा असं घडतं की काही लोक आमच्या भोवती सातत्याने असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

​कसब्यातील राष्ट्रपती भवन येथे काही नेत्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहे. यावेळी पवारांनी आपली खदखद बोलून दाखविली आहे. ते म्हणाले की, आता बारामतीकरांना मी नाही तर कुणीतरी दुसरा आमदारा मिळायला पाहिजे. या विधानानंतर अजित पवार हे बारामतीतून लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या विधानानंतर नेमका दादा आता बारामतीतून कुणाला उमेदवारी देणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे बारामतीतून विधानसभा लढतील, अशीही चर्चा होतेय. मी सोडून आमदार मिळायला पाहिजे- अजितदादा अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता 65 वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादा’ अशा घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जिथे पिकतं तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा. अजितदादा म्हणाले- बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे रस्ता बघा. काही राहिले असेल तर तेही मी मान्य करतो. कसे करायचे ते त्याचाही विचार करू. न मागता मेडिकल कॉलेज मिळालं. या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचं नाव देणार आहोत. तसेच, आयुर्वेदिक कॉलेज तयार करणार आहोत. विकासकामावर काय म्हणाले दादा?
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. काही चुकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. काही वेगळ्या अफवा उठल्या तर लगेच विश्वास ठेवू नका. राज्याची जबाबदारी राष्ट्रवादीने मला दिली. मला राज्यात फिरावेच लागेल. रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी निवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही. गंमतीचा भाग जाऊ द्या. अनेकदा असं घडतं की काही लोक आमच्या भोवती सातत्याने असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत.  

नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार:म्हणाले- फडणवीस नावाचं रसायन काय? हे तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल

नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार:म्हणाले- फडणवीस नावाचं रसायन काय? हे तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल

शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीस यांना 100 जन्मदेखील कळणार नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आता नितेश राणेदेखील आक्रमक झाले. राणेंनी राऊतांवर पलटवार करत म्हटले की, फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्या मालकांना चांगलंच कळालं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो, हे तुझ्या मालकांना विचार. फडणवीस हे सर्वांचे बाप असल्याचेही राणे यावेळी बोलतांना म्हणालेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम त्यासोबतच नितेश राणे अमित शहांवर बोलतांना म्हणाले की, अमित शहा हे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईमध्ये येत असतात. तुमच्या मालकांसारखे ते फक्त अंबानींच्या घरातच जात नाहीत. तर ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यालाही बळ देतात. तसेच, राणे पुढे म्हणाले की, जर तु्म्हाला मनपाच्या निवडणुका व्हाव्या, असे वाटत असेल. तर तुम्ही कोर्टात दाखल केलेल्या पिटिशन मागे घ्या. संजय राऊत काय म्हणाले होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जहरी टीका केली. राऊत म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी गुजरातला पळवले, राज्यातील अनेकसंस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजादेखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले. शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे फडणवीस यांना कळाले असते तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाही. 2019 साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होते हे फडणवीसांना कळले नव्हते. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असे म्हटले होते. ही पण बातमी वाचा… अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला नेतील:शरद पवारांच्या डोक्यात काय चालले हे 100 जन्म फडणवीसांना कळणार नाही- संजय राऊत संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला. त्यांचे मुंबईत काय काम आहे, मुंबई लुटण्यासाठीच ते येत आहेत. मणिपूरला जाऊन तेथील हिंसाचार रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मुबईत येण्याऐवजी मणिपूरला जाऊन परिस्थिती हाताळावी, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे. वाचा सविस्तर बातमी…

​शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीस यांना 100 जन्मदेखील कळणार नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आता नितेश राणेदेखील आक्रमक झाले. राणेंनी राऊतांवर पलटवार करत म्हटले की, फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्या मालकांना चांगलंच कळालं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो, हे तुझ्या मालकांना विचार. फडणवीस हे सर्वांचे बाप असल्याचेही राणे यावेळी बोलतांना म्हणालेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम त्यासोबतच नितेश राणे अमित शहांवर बोलतांना म्हणाले की, अमित शहा हे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईमध्ये येत असतात. तुमच्या मालकांसारखे ते फक्त अंबानींच्या घरातच जात नाहीत. तर ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यालाही बळ देतात. तसेच, राणे पुढे म्हणाले की, जर तु्म्हाला मनपाच्या निवडणुका व्हाव्या, असे वाटत असेल. तर तुम्ही कोर्टात दाखल केलेल्या पिटिशन मागे घ्या. संजय राऊत काय म्हणाले होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जहरी टीका केली. राऊत म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी गुजरातला पळवले, राज्यातील अनेकसंस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजादेखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले. शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे फडणवीस यांना कळाले असते तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाही. 2019 साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होते हे फडणवीसांना कळले नव्हते. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असे म्हटले होते. ही पण बातमी वाचा… अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला नेतील:शरद पवारांच्या डोक्यात काय चालले हे 100 जन्म फडणवीसांना कळणार नाही- संजय राऊत संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला. त्यांचे मुंबईत काय काम आहे, मुंबई लुटण्यासाठीच ते येत आहेत. मणिपूरला जाऊन तेथील हिंसाचार रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मुबईत येण्याऐवजी मणिपूरला जाऊन परिस्थिती हाताळावी, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे. वाचा सविस्तर बातमी…  

राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही:नेते व कार्यकर्त्यांना नितीन गडकारींचा टोला

राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही:नेते व कार्यकर्त्यांना नितीन गडकारींचा टोला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच रोखठोक बोलत असतात. राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत ते संगळ्यांचीच पोलखोल करतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याने कोणालाही वाईट वाटत नाही, उलट आणखी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात करतात. नागपूर येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. नितीन गडकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पैसे हे साधन नाही. माझे निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे यूट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगले काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे. पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. जो म्हणणार जात त्याला बसणार लात नितीन गडकरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असेही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना आमदार परिणय फुके यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी, इच्छा व्यक्त केली आहे. महानुभाव पंथाचे आशीर्वाद मिळाले तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत त्यांनी उपस्थित महानुभाव पंथीयांना देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

​केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच रोखठोक बोलत असतात. राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत ते संगळ्यांचीच पोलखोल करतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याने कोणालाही वाईट वाटत नाही, उलट आणखी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात करतात. नागपूर येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. नितीन गडकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पैसे हे साधन नाही. माझे निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे यूट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगले काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे. पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. जो म्हणणार जात त्याला बसणार लात नितीन गडकरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात, असेही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना आमदार परिणय फुके यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी, इच्छा व्यक्त केली आहे. महानुभाव पंथाचे आशीर्वाद मिळाले तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत त्यांनी उपस्थित महानुभाव पंथीयांना देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.  

तासगाव मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता:रोहित पाटलांची विधानसभेची वाट बिकट, खासदार विशाल पाटील घोरपडेंच्या बाजूने

तासगाव मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता:रोहित पाटलांची विधानसभेची वाट बिकट, खासदार विशाल पाटील घोरपडेंच्या बाजूने

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेला जसा अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विशाल पाटील म्हणाले आहेत. तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र आता खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे येथील राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता या मतदारसंघात ही दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरी आघाडी अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तयार होताना दिसत आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र या तिसऱ्या आघाडीमुळे रोहित पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तासगाव येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. मात्र यात आता तिसरी आघाडी निर्माण झाल्यावर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

​तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचे जाहीर केले आहे. लोकसभेला जसा अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विशाल पाटील म्हणाले आहेत. तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व स्वर्गीय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र आता खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे येथील राजकारणाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता या मतदारसंघात ही दोन्ही घराणी नकोत म्हणून तिसरी आघाडी अजित घोरपडे यांच्या नेतृत्वात तयार होताना दिसत आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर पर्याय उभा करण्याचा तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र या तिसऱ्या आघाडीमुळे रोहित पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तासगाव येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय काका पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. गेली अनेक वर्षे तासगाव-कवठेमहांकाळची आमदारकी स्व. आर. आर. पाटील यांच्या घरातच आहे. त्यांच्या विरोधात स्व. दिनकर (आबा) पाटील यांचा तसेच माजी खासदार संजय पाटील यांचा गट निवडणुकीत उतरत होता. अंजनी म्हणजे आर आर पाटील आणि चिंचणी म्हणजे संजयकाका पाटील या दोन्ही गावच्या नेत्यांनीच आजपर्यंत तालुक्यात आणि मतदारसंघाचे राजकारण केले आहे. मात्र यात आता तिसरी आघाडी निर्माण झाल्यावर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

‘दिव्य मराठी’चे सामूहिक अथर्वशीर्ष पठण:ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या साक्षीने शहरातील पहिले अथर्वशीर्ष पठण, महिलांचा उदंड प्रतिसाद

‘दिव्य मराठी’चे सामूहिक अथर्वशीर्ष पठण:ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या साक्षीने शहरातील पहिले अथर्वशीर्ष पठण, महिलांचा उदंड प्रतिसाद

विद्येची देवता मानल्या गेलेल्या गणपतीची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपती आणि दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. राजाबाजार येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीसमोर हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांचा उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला. ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या साक्षीने आज सकाळी 8 वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण पार पडले. यात विविध 35 संस्था-संघटनांच्या शेकडोहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. श्री संस्थान गणेश ट्रस्ट, स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुकामाई गाथा मंडळ, विहिंप यांचा यावेळी सहभाग होता. या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी महापौर नंदकुमार घोडेले यावेळी बोलताना म्हणाले, काल जल्लोषात, उत्साहात गणरायाचं आगमन झालेलं आहे. आज दिव्य मराठीने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. चंद्रकांत खैरेंनी ही अथर्वशीर्ष पठणाची परंपरा सुरु केली. दिव्य मराठी टिमचे आजच्या कार्यक्रमासाठी अभिनंदन. यावेळी बोलताना महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील वर्षी देखील अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करावा असे ब्राम्हण मंचच्या विजया कुलकर्णी म्हणाल्या. सामूहिक अथर्वशीर्ष पठणात महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल अनुराधा पुराणिक यांनी दिव्य मराठीचे आभार मानले. सामूहिक अथर्वशीर्ष पठण करताना खूप प्रसन्न वाटल्याच्या प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केल्या. चित्राद्वारे मुलांना जिंकता येतील 70 हजारांची बक्षिसे माझ्या मनातील बाप्पा… या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होत आहे. यात मुलांना 70 हजार रुपयांचे रोख बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. सर्वाधिक मुले सहभागी करणाऱ्या शाळांसाठीही आहे विशेष चषक. ड्रॉइंग शीट जागेवरच मिळेल, रंगाचे साहित्य सोबत आणावे. सव्वा लाख रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण महाकाल प्रतिष्ठानच्या संयुक्त संचलनाने ढोलवादन ही खास स्पर्धा आयोजित केली आहे. ढोल पथकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन या बक्षिसांचे प्रायोजक शिवसेना उद्धव गटाचे पश्चिम मतदार संघाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

​विद्येची देवता मानल्या गेलेल्या गणपतीची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपती आणि दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. राजाबाजार येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीसमोर हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांचा उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला. ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या साक्षीने आज सकाळी 8 वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण पार पडले. यात विविध 35 संस्था-संघटनांच्या शेकडोहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. श्री संस्थान गणेश ट्रस्ट, स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुकामाई गाथा मंडळ, विहिंप यांचा यावेळी सहभाग होता. या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी महापौर नंदकुमार घोडेले यावेळी बोलताना म्हणाले, काल जल्लोषात, उत्साहात गणरायाचं आगमन झालेलं आहे. आज दिव्य मराठीने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. चंद्रकांत खैरेंनी ही अथर्वशीर्ष पठणाची परंपरा सुरु केली. दिव्य मराठी टिमचे आजच्या कार्यक्रमासाठी अभिनंदन. यावेळी बोलताना महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील वर्षी देखील अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करावा असे ब्राम्हण मंचच्या विजया कुलकर्णी म्हणाल्या. सामूहिक अथर्वशीर्ष पठणात महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल अनुराधा पुराणिक यांनी दिव्य मराठीचे आभार मानले. सामूहिक अथर्वशीर्ष पठण करताना खूप प्रसन्न वाटल्याच्या प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केल्या. चित्राद्वारे मुलांना जिंकता येतील 70 हजारांची बक्षिसे माझ्या मनातील बाप्पा… या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होत आहे. यात मुलांना 70 हजार रुपयांचे रोख बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. सर्वाधिक मुले सहभागी करणाऱ्या शाळांसाठीही आहे विशेष चषक. ड्रॉइंग शीट जागेवरच मिळेल, रंगाचे साहित्य सोबत आणावे. सव्वा लाख रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण महाकाल प्रतिष्ठानच्या संयुक्त संचलनाने ढोलवादन ही खास स्पर्धा आयोजित केली आहे. ढोल पथकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन या बक्षिसांचे प्रायोजक शिवसेना उद्धव गटाचे पश्चिम मतदार संघाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.  

‘दादाचा वादा’ अजित पवारांचे गाणे रिलीज:गाण्यामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

‘दादाचा वादा’ अजित पवारांचे गाणे रिलीज:गाण्यामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे ‘दादाचा वादा’ हे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आली आहे. हे गाणे संपूर्ण गुलाबी थीमवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात अजित पवारांच्या कामाचे तसेच त्यांच्या स्वभावाचे वर्णन करण्यात आले आहे. दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद ठेवणारा आणि शब्दाला पक्का असणारा नेता, अशी अजित पवारांची ओळख असल्याचे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या गाण्यात महिला, शेतकरी, आदिवासी, युवा आणि इतर घटकांसाठी राबवलेल्या योजना आणि कामांची माहिती या गाण्यातून देण्यात आली आहे. अजित पवार समाजाच्या भल्यासाठी काम करतात असा संदेशही यातून देण्यात आला आहे. या गाण्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असे बोलले जात आहे. अजित पवारांचे हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर रिलीज होताच तरुणाईने त्याला भरभरून पाठिंबा दिला आहे. युवा वर्गाने या गाण्यावर कमेंट करत या गाण्याचे कौतुक केले आहे. या गाण्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला अजित पवारांना चांगला फायदा होऊ शकतो. या गाण्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये देखील एक नवी आशा आणि उत्साह संचारला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवरून देखील नवा वाद सुरू झाला होता. लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवरून त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वगळत त्याठिकाणी ‘दादाचा वादा’, असे लिहिले होते. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आला होता. विरोधकांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल काँग्रेसने करत अजितदादांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता.

​राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे ‘दादाचा वादा’ हे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आली आहे. हे गाणे संपूर्ण गुलाबी थीमवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात अजित पवारांच्या कामाचे तसेच त्यांच्या स्वभावाचे वर्णन करण्यात आले आहे. दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद ठेवणारा आणि शब्दाला पक्का असणारा नेता, अशी अजित पवारांची ओळख असल्याचे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या गाण्यात महिला, शेतकरी, आदिवासी, युवा आणि इतर घटकांसाठी राबवलेल्या योजना आणि कामांची माहिती या गाण्यातून देण्यात आली आहे. अजित पवार समाजाच्या भल्यासाठी काम करतात असा संदेशही यातून देण्यात आला आहे. या गाण्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असे बोलले जात आहे. अजित पवारांचे हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर रिलीज होताच तरुणाईने त्याला भरभरून पाठिंबा दिला आहे. युवा वर्गाने या गाण्यावर कमेंट करत या गाण्याचे कौतुक केले आहे. या गाण्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला अजित पवारांना चांगला फायदा होऊ शकतो. या गाण्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये देखील एक नवी आशा आणि उत्साह संचारला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवरून देखील नवा वाद सुरू झाला होता. लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवरून त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वगळत त्याठिकाणी ‘दादाचा वादा’, असे लिहिले होते. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आला होता. विरोधकांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल काँग्रेसने करत अजितदादांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता.  

हिंगोलीत पोलिस अधिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद:305 गावांमध्ये एक गाव एक गणपती, जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापना

हिंगोलीत पोलिस अधिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद:305 गावांमध्ये एक गाव एक गणपती, जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापना

हिंगोली जिल्हयात जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याच्या पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला असून 305 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापना झाला आहे. तर जिल्हाभरात 1464 ्ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन झाल्या आहेत. या गणेश मंडळांकडून समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची तयारी चालविली आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभुमीवर एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले होते. या शिवाय अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी पोलिस ठाण्यांतर्गत घेतलेल्या बैठकीतही याबाबत आवाहन केले होते. जिल्हयातील 710 पैकी 305 गावांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे. यामध्ये औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 65 गावांमध्ये हि संकल्पना राबविण्यात आली असून कळमनुरी 27, सेनगाव 31, आखाडा बाळापूर 42, हट्टा 10, कुरुंदा 19, हिंगोली ग्रामीण 32, गोरेगाव 15, नर्सी नामदेव 14, बासंबा 26 तर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यांतर्गत 24 गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्हाभरात 262 गावांमध्ये हि संकल्पना राबविली होती. मात्र यावर्षी यामध्ये 43 गावांची भरपडली आहे. या शिवाय जिल्हाभरात एकूण 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. आता गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्हयात एक गाव एक गणपतीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण हलका झाला असून नुकसानग्रस्तांनाही मदत मिळणार असल्याने या गणेशमंडळांचे कौतूक केले जात आहे.

​हिंगोली जिल्हयात जास्तीत जास्त गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याच्या पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आवाहनाला गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला असून 305 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापना झाला आहे. तर जिल्हाभरात 1464 ्ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन झाल्या आहेत. या गणेश मंडळांकडून समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची तयारी चालविली आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभुमीवर एक गाव एक गणपती संकल्पना राबवून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले होते. या शिवाय अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी पोलिस ठाण्यांतर्गत घेतलेल्या बैठकीतही याबाबत आवाहन केले होते. जिल्हयातील 710 पैकी 305 गावांनी या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे. यामध्ये औंढा पोलिस ठाण्यांतर्गत 65 गावांमध्ये हि संकल्पना राबविण्यात आली असून कळमनुरी 27, सेनगाव 31, आखाडा बाळापूर 42, हट्टा 10, कुरुंदा 19, हिंगोली ग्रामीण 32, गोरेगाव 15, नर्सी नामदेव 14, बासंबा 26 तर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यांतर्गत 24 गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्हाभरात 262 गावांमध्ये हि संकल्पना राबविली होती. मात्र यावर्षी यामध्ये 43 गावांची भरपडली आहे. या शिवाय जिल्हाभरात एकूण 1464 ठिकाणी गणेशमुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. आता गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. जिल्हयात एक गाव एक गणपतीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण हलका झाला असून नुकसानग्रस्तांनाही मदत मिळणार असल्याने या गणेशमंडळांचे कौतूक केले जात आहे.  

अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला नेतील:शरद पवारांच्या डोक्यात काय चालले हे 100 जन्म फडणवीसांना कळणार नाही- संजय राऊत

अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला नेतील:शरद पवारांच्या डोक्यात काय चालले हे 100 जन्म फडणवीसांना कळणार नाही- संजय राऊत

शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे फडणवीस यांना कळाले असते तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाही. 2019 साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होते हे फडणवीसांना कळले नव्हते. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला. त्यांचे मुंबईत काय काम आहे, मुंबई लुटण्यासाठीच ते येत आहेत. मणिपूरला जाऊन तेथील हिंसाचार रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मुबईत येण्याऐवजी मणिपूरला जाऊन परिस्थिती हाताळावी, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखण्यात येत आहे. महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करत महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे, महत्त्वाच्या संस्था, आर्थिक केंद्रे गुजरातला पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अमित शहा यांच्याबाबत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मुंबई आणि महापालिका त्यांना कमजोर करायची आहे. त्यामुळेच ते महापालिका, विधानसभा निवडणुका घेण्यात येत नाही. त्यांनी मुंबई, पुणे, नागपूर महापालिका लुटण्यासाठी त्यांच्या लोकांना दिली आहे. मुंबई लुटून त्यांचे दलाल त्यांना पैसे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महापालिका लुटण्याचा त्यांचा मोठा घोटाळा आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्या, असे आव्हानही त्यांनी दिले.

​शरद पवार यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे फडणवीस यांना कळाले असते तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाही. 2019 साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होते हे फडणवीसांना कळले नव्हते. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला. त्यांचे मुंबईत काय काम आहे, मुंबई लुटण्यासाठीच ते येत आहेत. मणिपूरला जाऊन तेथील हिंसाचार रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मुबईत येण्याऐवजी मणिपूरला जाऊन परिस्थिती हाताळावी, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखण्यात येत आहे. महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करत महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे, महत्त्वाच्या संस्था, आर्थिक केंद्रे गुजरातला पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अमित शहा यांच्याबाबत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत, असे ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मुंबई आणि महापालिका त्यांना कमजोर करायची आहे. त्यामुळेच ते महापालिका, विधानसभा निवडणुका घेण्यात येत नाही. त्यांनी मुंबई, पुणे, नागपूर महापालिका लुटण्यासाठी त्यांच्या लोकांना दिली आहे. मुंबई लुटून त्यांचे दलाल त्यांना पैसे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महापालिका लुटण्याचा त्यांचा मोठा घोटाळा आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्या, असे आव्हानही त्यांनी दिले.  

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील:आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील:आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. नागपूर येथील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले, असे ते यावेळी म्हणाले. चित्रा वाघ यांचे गणरायाकडे साकडे दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणरायाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

​भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. नागपूर येथील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा ते एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचे महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला, तर ते मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली. महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले, असे ते यावेळी म्हणाले. चित्रा वाघ यांचे गणरायाकडे साकडे दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणरायाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.