मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा नेत्याचेच ठिय्या आंदोलन:विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करण्याची केली मागणी

मनोज जरांगेंच्या विरोधात मराठा नेत्याचेच ठिय्या आंदोलन:विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करण्याची केली मागणी

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच कोंडीत धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे यांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. मात्र मनोज जरांगे यांच्याविरोधातही काही मराठा नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सोलापूरच्या बार्शी येथील अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगेंच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब शिंदे या मंतरठ समाजाच्या कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते, मात्र त्यावर काही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णासाहेब शिंदे यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावेळी बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते, त्यांनी उत्तरे दिले नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारून चूक केली का? मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला आहे, पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून राबत आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाच्या विरोधात तुम्ही बोलला, त्यांच्या कुटुंबातील लोकांविषयी बोललात. बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ राजेंद्र राऊत आहे, त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडेही तोंड आहे, असे ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मला एक महिन्याची मुदत द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण काम करू. मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील, असे शिंदे म्हणाले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित आहेत. बार्शी येथील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगेंनी खुलासा करावा अण्णासाहेब शिंदे यांनी काही प्रश्न व मुद्दे मनोज जरांगे यांना विचारले होते.
1. महायुतीचे सरकार ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
2. लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
3. मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.
4. मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.
5. दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.
6. दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे 300 पेक्षा अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
7. दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार, मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?
8. दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.
9. अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आपल्यासाहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.

​मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच कोंडीत धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे यांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. मात्र मनोज जरांगे यांच्याविरोधातही काही मराठा नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सोलापूरच्या बार्शी येथील अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगेंच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब शिंदे या मंतरठ समाजाच्या कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते, मात्र त्यावर काही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णासाहेब शिंदे यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावेळी बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते, त्यांनी उत्तरे दिले नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारून चूक केली का? मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला आहे, पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून राबत आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाच्या विरोधात तुम्ही बोलला, त्यांच्या कुटुंबातील लोकांविषयी बोललात. बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ राजेंद्र राऊत आहे, त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडेही तोंड आहे, असे ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले, मला एक महिन्याची मुदत द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण काम करू. मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील, असे शिंदे म्हणाले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित आहेत. बार्शी येथील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगेंनी खुलासा करावा अण्णासाहेब शिंदे यांनी काही प्रश्न व मुद्दे मनोज जरांगे यांना विचारले होते.
1. महायुतीचे सरकार ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
2. लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
3. मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.
4. मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.
5. दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.
6. दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे 300 पेक्षा अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
7. दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार, मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?
8. दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.
9. अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आपल्यासाहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment