शिळ्या, उरलेल्या अन्नाच्या विल्हेवाटीसाठी अन्नाची कदर शेतकऱ्यांचा आदर:पर्यावरणपूरक उपक्रम, जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे

शिळ्या, उरलेल्या अन्नाच्या विल्हेवाटीसाठी अन्नाची कदर शेतकऱ्यांचा आदर:पर्यावरणपूरक उपक्रम, जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे

‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’ हा स्वच्छता,आरोग्य व पर्यावरणास पूरक ठरणारा उपक्रम कौतुकास्पद असून, ही भावना अधिकाधिक वाढीस लागून जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता सर्वांनी प्रयत्नरत रहावे, असे मत मनपाच्या सहायक आयुक्त दीप्‍ती गायकवाड यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी गुरुवारी छत्री तलाव नजीकच्या उड्डाणपुलाजवळ खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याचे पूजन करताना गायकवाड बोलत होत्या. गणेशोत्सव, महालक्ष्मी आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महाप्रसाद होतात. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी एमएच २७ एटीएस ग्रुप्सतर्फे हा उपक्रम सात वर्षांपासून सुरळीत सुरू आहे. या वेळी, सर्वात आधी सहायक आयुक्त दीप्ती गायकवाड व जागरूक नागरिक संदीप गुल्हाने यांच्या हस्ते धरती मातेचे व अन्न देवतेचे पूजन करून गोळा केलेले अन्न धरती मातेला अर्पण करण्यात आले. या वेळी दस्तूर नगर झोन कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर, ज्येष्‍ठ स्‍वास्‍थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्‍वास्‍थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, प्रसाद कुलकर्णी, मनीष हडाले, योगेश कंडारे, मनीष नकवाल, धर्मेंद्र ढिके, मुन्ना महल्ले, पृथ्वी पांडे, ऋग्वेद घुरडे, किशोर कडू आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रतिसाद स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणास पूरक ठरणाऱ्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. शहरातील जागरूक व स्वच्छताप्रिय नागरिकांनी प्रमोद पांडे ८९७५५२६९६८ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अन्न संकलित करण्यात आले. आधी गरजू आणि भुकेल्यांना सन्मानाने अन्न देण्यात आले. त्यानंतर उरलेले अन्न आज छत्री तलाव पुलालगत धरती मातेला अर्पण करण्यात आले.

​‘अन्नाची कदर, शेतकऱ्यांचा आदर’ हा स्वच्छता,आरोग्य व पर्यावरणास पूरक ठरणारा उपक्रम कौतुकास्पद असून, ही भावना अधिकाधिक वाढीस लागून जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता सर्वांनी प्रयत्नरत रहावे, असे मत मनपाच्या सहायक आयुक्त दीप्‍ती गायकवाड यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी गुरुवारी छत्री तलाव नजीकच्या उड्डाणपुलाजवळ खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याचे पूजन करताना गायकवाड बोलत होत्या. गणेशोत्सव, महालक्ष्मी आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महाप्रसाद होतात. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी एमएच २७ एटीएस ग्रुप्सतर्फे हा उपक्रम सात वर्षांपासून सुरळीत सुरू आहे. या वेळी, सर्वात आधी सहायक आयुक्त दीप्ती गायकवाड व जागरूक नागरिक संदीप गुल्हाने यांच्या हस्ते धरती मातेचे व अन्न देवतेचे पूजन करून गोळा केलेले अन्न धरती मातेला अर्पण करण्यात आले. या वेळी दस्तूर नगर झोन कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर, ज्येष्‍ठ स्‍वास्‍थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्‍वास्‍थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, प्रसाद कुलकर्णी, मनीष हडाले, योगेश कंडारे, मनीष नकवाल, धर्मेंद्र ढिके, मुन्ना महल्ले, पृथ्वी पांडे, ऋग्वेद घुरडे, किशोर कडू आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रतिसाद स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणास पूरक ठरणाऱ्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. शहरातील जागरूक व स्वच्छताप्रिय नागरिकांनी प्रमोद पांडे ८९७५५२६९६८ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अन्न संकलित करण्यात आले. आधी गरजू आणि भुकेल्यांना सन्मानाने अन्न देण्यात आले. त्यानंतर उरलेले अन्न आज छत्री तलाव पुलालगत धरती मातेला अर्पण करण्यात आले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment