Category: marathi

पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी:दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर हजेरी; मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी:दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर हजेरी; मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून येथे पावसाने विश्रांती घेतली होती. सध्या शहरातील अनेक भागात ढगाळ वातावरण असून, दुपारी वाऱ्याचा वेग वाढून हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 33°C आणि किमान तापमान 27°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मागील आठवड्यात, पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली होती. विशेषतः...

एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती:जयंती तो बहाना हें, दिल्ली में सरकार लाना हें; महादेव जानकरांचे दिल्लीत विधान

एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती:जयंती तो बहाना हें, दिल्ली में सरकार लाना हें; महादेव जानकरांचे दिल्लीत विधान

एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी हे विधान केले...

पुण्यात भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना चिरडले:चौघांचे हातपाय मोडले, एमपीएससीचा आज त्यांचा पेपर होता; एकनाथ शिंदेंनी साधला संवाद

पुण्यात भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना चिरडले:चौघांचे हातपाय मोडले, एमपीएससीचा आज त्यांचा पेपर होता; एकनाथ शिंदेंनी साधला संवाद

पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने चहाच्या टपरी जवळ उभे राहून चहा पिणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना चिरडले आहे. यात एकूण 12 विद्यार्थी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यावर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आज या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. अपघात इतका भीषण होता की चार जणांचे पाय मोडले आहेत, तर...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाट्यमय कलाटणी:नीलेश चव्हाणने मैत्रिणीला ठेवले होते सोबत, तिच्याच मोबाईलचा केला होता वापर

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाट्यमय कलाटणी:नीलेश चव्हाणने मैत्रिणीला ठेवले होते सोबत, तिच्याच मोबाईलचा केला होता वापर

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित नीलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून, त्याच्या अटकेमागे एक नाट्यमय कहाणी उघडकीस आली आहे. पुण्यातून फरार झालेल्या नीलेशला त्याच्याच मैत्रिणीमुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, नीलेशने फिरायला जाऊ असे सांगून मैत्रिणीला सोबत नेले आणि तिच्या मोबाईल फोनचा वापरही केला. मात्र याच चुकांमुळे तो अखेर अडकला गेला. पोलिसांचे लक्ष एका विशिष्ट मोबाइल नंबरकडे होते...

मोठी बातमी:बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला दिल्लीतून अटक; पवारांच्या नेत्यावर केले होते आरोप

मोठी बातमी:बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला दिल्लीतून अटक; पवारांच्या नेत्यावर केले होते आरोप

बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. आता कासले यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराची गाडी मी कोविड काळात पकडली होती. त्या गाडीत कोट्यवधीचे ड्रग्ज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का:महाराष्ट्रात नाही तर 2800 किमी अंतरावर नागालँडमधील सात आमदारांनी पक्ष सोडला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का:महाराष्ट्रात नाही तर 2800 किमी अंतरावर नागालँडमधील सात आमदारांनी पक्ष सोडला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांना हा धक्का महाराष्ट्रात नाही तर 2800 किमी अंतरावर असलेल्या नागालँडमध्ये लागला आहे. नागालँडमध्ये, अजित पवार गटातील सर्व सात आमदारांनी आता राष्ट्रवादी पक्ष सोडला आहे. राष्ट्रवादीचे सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) मध्ये सामील झाले. या विलीनीकरणामुळे, मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत...

‘एमपीएल’मध्ये बीडच्या पाच खेळाडूंची निवड:जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 4 जूनपासून पुण्यात रंगणार थरार

‘एमपीएल’मध्ये बीडच्या पाच खेळाडूंची निवड:जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 4 जूनपासून पुण्यात रंगणार थरार

बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पाच खेळाडूंनी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेसाठी निवड सुनिश्चित केली आहे. यामध्ये सचिन धस (कोल्हापूर टस्कर्स), ऋषिकेश सोनवणे (पुणेरी बाप्पा), सौरभ नवले आणि देव नवले (सातारा वॉरियर्स), तसेच समर्थ कदम (रत्नागिरी जेट्स) या खेळाडूंचा सहभाग आहे. ही निवड केवळ खेळाडूंच्या मेहनतीचे फलित नसून बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पारदर्शक आणि गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या निवड प्रक्रियेचेही प्रत्यक्ष फलित...

महाराष्ट्रात कोरोनाने चिंता वाढवली:वसईत एकाचा मृत्यू, राज्यात 467 सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाने चिंता वाढवली:वसईत एकाचा मृत्यू, राज्यात 467 सक्रिय रुग्ण

देशात तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 467 सक्रिय रुग्ण असल्याचे समजते. त्यात आता वसई येथे एका 42 वर्षीय विनीत विजय किणी यांचा कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विनीत विजय किणी हे मुंबई येथील रहेजा रुग्णालयात उपचार घेत होते. विनीत विजय किणी हे काही दिवसांपासून आजारी...

भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांची जोरदार तयारी, पहा संपूर्ण यादी

भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांची जोरदार तयारी, पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. महायुती सरकारमधील महत्त्वाचा पक्ष भाजपने ग्रामीण पातळीवर पक्ष वाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी भाजप 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली होती. आता उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने अखेर राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली...

दोन्ही पवार कधी एकत्र येणार?:शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, रोहित पवारही स्पष्टच बोलले; ते मुहूर्त शोधत आहेत – संजय शिरसाट

दोन्ही पवार कधी एकत्र येणार?:शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, रोहित पवारही स्पष्टच बोलले; ते मुहूर्त शोधत आहेत – संजय शिरसाट

महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका वाक्यातच विषय संपवला. दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार ‘मला माहीत नाही’, असे म्हणाले. शरद...