युतीत शिंदे- अजित पवारांना केवळ 40 ते 50 जागा:लोकसभेतही मोदी-शहांमुळेच त्यांना स्ट्राईकरेट; खासदार संजय राऊत यांचा निशाणा
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष आहे आणि इतर दोन पक्ष हे आश्रीत पक्ष आहेत. अशा आश्रीत पक्षांना जास्त आवाज नसतो. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षातील गुजराती व्यापार मंडळ या आश्रीत पक्षांसमोर जे तुकडे फेकतील, ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला युतीत केवळ 40 ते 50 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षासोबत स्वाभिमानासाठी लढली ती केवळ शिवसेना, प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. एवढी हिंमत दुसऱ्या कोणामध्येच नाही. ती हिंमत केवळ शिवसेनेमध्ये होती, असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी स्वाभिमान, अभिमान हे सर्व शब्द संपलेले असल्याचे देखील ते म्हणाले. मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपद हातात दिले. त्यामुळे जे दिले ते घ्या आणि गप्प बसा, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्राइक रेट बाबत वक्तव्य केले होते. शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त असून जागा वाटपात जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट हा केवळ मोदी आणि शहा यांच्यामुळेच असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि शहा यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर अडीच वर्षांपूर्वी दबाव आणला नसता तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले नसते. त्याच्यामुळे मिळालेला स्ट्राइक रेट दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच चिन्ह घ्यावे आणि त्यानंतर निवडणूक लढवावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले. त्यांनंतर त्यांनी स्ट्राइक रेट दाखवला तर आम्ही तो मान्य करु असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मुख्य पक्ष आहे आणि इतर दोन पक्ष हे आश्रीत पक्ष आहेत. अशा आश्रीत पक्षांना जास्त आवाज नसतो. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षातील गुजराती व्यापार मंडळ या आश्रीत पक्षांसमोर जे तुकडे फेकतील, ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला युतीत केवळ 40 ते 50 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षासोबत स्वाभिमानासाठी लढली ती केवळ शिवसेना, प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. एवढी हिंमत दुसऱ्या कोणामध्येच नाही. ती हिंमत केवळ शिवसेनेमध्ये होती, असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासाठी स्वाभिमान, अभिमान हे सर्व शब्द संपलेले असल्याचे देखील ते म्हणाले. मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपद हातात दिले. त्यामुळे जे दिले ते घ्या आणि गप्प बसा, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्ट्राइक रेट बाबत वक्तव्य केले होते. शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त असून जागा वाटपात जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट हा केवळ मोदी आणि शहा यांच्यामुळेच असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी आणि शहा यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर अडीच वर्षांपूर्वी दबाव आणला नसता तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले नसते. त्याच्यामुळे मिळालेला स्ट्राइक रेट दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःच चिन्ह घ्यावे आणि त्यानंतर निवडणूक लढवावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले. त्यांनंतर त्यांनी स्ट्राइक रेट दाखवला तर आम्ही तो मान्य करु असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.