[ad_1]

नवी दिल्ली: आरबीआयने गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएमवर अनेक निर्बंध लादले होते. यामुळे त्याची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स सुमारे ४० टक्क्यांनी घसरले. बुधवारी कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची भेट घेतली. या दहा मिनिटांच्या भेटीने पेटीएमच्या विरोधात वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशाच बदलली.

पेटीएमचे शेअर्स बुधवारी सुमारे पाच टक्क्यांनी वाढले आणि गुरुवारीही सुमारे १० टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शर्मा यांना सांगण्यात आले की, आरबीआयच्या कारवाईमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही आणि कंपनीने मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी बुधवारी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठक केली आणि त्यांना आपली अडचण सांगितली. आरबीआयने मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. केवळ ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी असेल परंतु वापरकर्ते २९ फेब्रुवारीपासून त्यांचे वॉलेट किंवा फास्टॅग टॉप अप करू शकणार नाहीत. तसेच खात्यात पैसेही जमा होणार नाहीत. आरबीआयच्या या कारवाईमुळे पेटीएममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः शेखर शर्मा कंपनीला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी वापरकर्त्यांना आश्वासन दिले आहे की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि पेटीएमचे ॲप २९ फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणे काम करेल.

Paytm शेअर

पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. तेव्हा हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरला होता. त्याची इश्यू किंमत २१५० रुपये होती. परंतु त्याची लिस्टिंग फिकी राहिली आणि ती इश्यू किमतीच्या जवळपासही पोहोचली नाही. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९९८.३० रुपये आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअर्सने ही पातळी गाठली होती. बुधवारी तो ३९५.५० रुपयांवर घसरला होता, जो ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. आज ते व्यवहारादरम्यान सुमारे १० टक्क्यांनी वाढून ४९६.७५ रुपयांवर पोहोचले. सकाळी ११ वाजता तो ८.८०% च्या वाढीसह ४९१.३५ रुपयांवर ट्रेड करत होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *