[ad_1]

रांची: हेमंत सोरेन यांचा राजीनामा आणि त्यानंतर ईडीकडून त्याना झालेली अटक या सर्व घडामोडी सुरू असताना चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यातील आघाडी सरकारला ४७ आमदाराचा पाठिंबा आहे. त्याच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. मात्र राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शपथ घेण्यासाठी तारीख आणि वेळ अद्याप दिली नाही.

चंपई सोरेन यांनी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासह गुरुवारी राज्यपालांची भेट घेतल आणि नव्या सरकारबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. राज्यात सुरू असलेल्या या राजकीय गोंधळात जेएमएम आणि काँग्रेसच्या सर्व आमदारांना रांचीहून हैदराबादकडे आणण्यात आले. सर्व आमदारांना ३ बसमधून बिसरा मुंडा विमानतळावर नेण्यात आले. हे सर्वजण विशेष विमानाने हैदराबादला जाणार होते. दरम्यान खराब विमानामुळे विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही, त्यामुळे सर्व आमदार पुन्हा सर्किट हाऊसला परतले. त्यानंतर पुन्हा रात्री सर्व आमदार हैदराबादला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करून २२ तास झालेत त्यामुळे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असे चंपई सोरेन म्हणाले. आम्ही राज्यपालांना ४३ आमदार सोबत असल्याचा व्हिडिओ देखील दाखवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. आमदारांचा पाठिंबा असताना देखील सरकार स्थापनेसाठी आमंत्रण न देणे हा संविधानाचा अपमान आणि जनमत नाकारण्यासारखे आहे.

झारखंड विधानसभेत ८१ सदस्य आहेत. सरकार स्थापनेसाठी ४१ हा आकडा असून चंपई यांनी राज्यपालांकडे ४७ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र दिले आहे. यात जेएमएमचे २९, काँग्रेसचे १७, आरजेडी, सीपीआय यांचे प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. विरोधात असलेल्या एनडी आघाडीत ३२ आमदार असून त्यात भाजपचे २६, एजेएसयुचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) १ आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *