[ad_1]

वर्धा: हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपली कुठलीही हरकत नसल्याचे पत्र लिहून देणे बंधनकारक केले आहे. ‘सीसीआय’च्या जाचक अटी आणि कापूस पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याचे चित्र आहे.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात प्रामुख्याने कापसाचे उत्पादन होते. दीड-दोन वर्षांपूर्वी कापसाला १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. अधिक दराच्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची अधिक लागवड केली. मागील वर्षी दर कोसळल्याने अनेकांनी घरातच कापूस साठवून ठेवला. दरवाढीच्या आशेवर दुसरा हंगाम संपण्याची वेळ आली तरीही अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात ७ हजार २०० रुपयांच्या हमीभावापेक्षाही कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे. साधारणत: ६ हजार ५०० रुपयांनी कापूस खरेदी केली जात आहे. देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुणवत्तेच्या आधारावर कापूस खरेदी करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.

खुल्या बाजारात ही स्थिती असताना सीसीआयने सुपर ग्रेडच्या कापसाला ६ हजार ९२० रुपयांचा दर दिला. अधिक दराच्या आशेने शेतकरी सीसीआयच्या केंद्रावर गेले असता सात-बारा, पेरापत्रक, ऑनलाइन नोंदणीची अट टाकण्यात आली आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद उफाळला होता. काही काळ लिलावही बंद राहिले. देवळीत आजवर पावणेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश दिले होते. शेतकऱ्यांनी हमीभावाची मागणी केल्याने व्यापाऱ्यांसोबत त्यांचे वाद वाढले. अत्यल्प दराने कापूस खरेदी अजूनही सुरू आहे. सध्या दरातून उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. व्यापारी आणि सीसीआयच्या अडेलतट्टू धोरणामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प पडू लागले आहेत,’ अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे देवळी प्रमुख किरण ठाकरे यांनी सांगितले.

भाजप आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा, गणपत गायकवाड प्रकरणी सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

देवळी बाजार समितीत व्यवहार बंद?
हमीभावाने कपाशीची खरेदी करणे शक्य नसल्याचे व्यापारी सांगतात. पण, सरकारने हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास गुन्हे दाखल करू असा इशारा दिला आहे. यातून बचावासाठी व्यापाऱ्यांनी हमीपत्राची युक्ती योजली आहे. यानंतरही कारवाईतून सुटका होणे शक्य नसल्याने देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार पडले. दोन दिवसांसाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या
– हमीभावाने; ७,२०० रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी करावी.
– खरेदीनंतर तीन दिवसांत धनादेश द्यावा.
– सीसीआयच्या जाचक अटी रद्द कराव्या.
– भाव मान्य नसलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचा पुन्हा लिलाव

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *