[ad_1]
अमित शाह यांनी आम्ही आमची विचारधारा जनसंघापासून मानत आलेलो आहे, यापुढेही मानत राहू असं म्हटलं. आमची विचारधारा ज्या पक्षाला मान्य होईल, तो आमच्यासोबत येईल, त्यांचं स्वागत असेल, असं अमित शाह म्हणाले. ते ईटी नॉऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते.
शिरोमणी अकाली दल आणि भाजपची केंद्रात आणि पंजाबमध्ये १९९६ पासून युती होती. केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन अकाली दलानं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारनं २०२१ मध्ये कृषी कायदे देखील मागं घेतले होते. शिरोमणी अकाली दलानं पंजाब विधानसभा निवडणूक बसपासोबत युती करुन लढवली होती. त्यात त्यांना केवळ तीनं जागांवर विजय मिळाला होता.
बिहारमध्ये जदयू पुन्हा एनडीएसोबत आलेला आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये भाजपचा शिरोमणी अकाली दलाला पुन्हा सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. आंध्र प्रदेशात भाजपची चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पार्टीसोबत चर्चा सुरु आहेत.
अमित शाह यांनी आम्ही कायम आघाडीधर्म पाळलेला असल्याचं म्हटलं. आम्ही कोणत्याही मित्रपक्षाला एनडीएतून बाहेर जाण्यास सांगितलं नाही. काही राज्यांमध्ये आमच्याकडे अधिक जागा असून देखील मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना दिल्याचं अमित शाह म्हणाले.
[ad_2]
Source link