[ad_1]

कुचबिहार: लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी विरुद्ध विरोधकांच्या इंडिया आघाडीची या लढतीत एकमेकांवर जोरदार आरोप सुरू आहेत. अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना विचित्र आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले.

एका निवडणुक प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या रेशनच्या पॅकेटवर पीएम नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. मी एकवेळ उपाशी राहून मरण पत्करेने पण &*$$$## मोदींचा फोटो असलेले रेशन खाणार नाही.

ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. पक्षाचे नेते सुकांता मजूमदार यांनी या अक्षेपार्ह वक्तव्यासाठी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदु अधिकारी यांनी देखील एक्सवरून बॅनर्जी यांच्यावर टीका केली.


पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने सर्व तपास यंत्रणांना कामाला लावले आहेत. राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. निवडणुकीच्या आधी CAA लागू करण्यात आला, यावर देखील बॅनर्जी यांनी केंद्रावर टीका केली.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. राज्यातील ४२ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल रोजी कूच बिहारमधील अलीपुरद्वार, जलपाइगुडी मतदारसंघात मतदान होईल. तर सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेसने सात टप्प्यात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर देखील टीका केली आहे. राज्यात टीएमसी स्वबळावर लोकसभा लढत आहे. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आहे.

२०१९च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ४२ पैकी सर्वाधिक २२, भाजपने १८ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. डाव्यांना राज्यात एकही जागा मिळाली नव्हती. भाजपने २०१४च्या तुलनेत १६ जागा अधिक जिंकल्या होत्या. यावेळी राज्यात काँग्रेस आणि डावे एकत्र असल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *